गावगाड्यात शिकणारे जगाच्या व्यासपीठावर सदैव यशस्वी

गावगाड्यात शिकणारे जगाच्या व्यासपीठावर सदैव यशस्वी

कोल्हापूर - गावागाड्यातल्या शाळेत जे शिकतात ते जगाच्या व्यासपीठावर नापास होत नाहीत. गावगाड्यातल्या शाळा समाजमन कळण्याचे ठिकाण असून, तेथे माणूसपण पाहायला मिळते. विद्यार्थ्यांच्या मनाचा भक्कम पाया या शाळांत रचला जातो, असे प्रतिपादन कृषी व फलोत्पादन, पणन खात्याचे राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी आज येथे केले.

जिल्हा परिषदेतर्फे आयोजित जे. पी. नाईक माझी शाळा समृद्धी अभियान बक्षीस, प्राथमिक शाळा शताब्दी सोहळा मानपत्र व जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण सोहळ्यात ते बोलत होते. राजाराम महाविद्यालयातील यशवंतराव चव्हाण सभागृहात कार्यक्रम झाला. 

श्री. खोत म्हणाले, "लोक सहभाग वाढवून प्राथमिक शिक्षणाला चालना देण्याचे काम जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने केले आहे. कष्टाळू, कर्तबगार माणसं परिस्थितीचे भान ठेवून काम कशी करतात, याचे हा विभाग उत्तम उदाहरण आहे. शाहू, फुले, आंबेडकर यांनी शिक्षणाचे महत्त्व ओळखून शिक्षणाला नैतिक अधिष्ठान दिले. तळागाळातील माणसाला सन्मान मिळवून देण्यासाठी व देशाची प्रगती करण्यासाठी शिक्षणाला महत्त्व दिले. महात्मा फुले यांनी कठीण काळात समाजात आत्मविश्वास निर्माण करण्याचे काम केले."

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com