अल्पसंख्याकच ठरवतील राज्याची सत्ता कोणाच्या हाती द्यायची - शशिकांत आमने

solapur
solapur

कुर्डु (सोलापूर) - महाराष्ट्रातील 46 अल्पसंख्याक जातीना बरोबर घेऊन एस. बी. सी. संघर्ष समितीच्या माध्यमातून लढा व चळवळ उभारली असुन, जे आमच्या मागण्या मान्य करतील त्या सोबत येणाऱ्या लोकसभा व  विधानसभा निवडणुकीत राहु. आम्हाला कोणाचीही अॅलर्जी नाही, असे मत एस. बी. संघर्ष समितीचे संस्थापक अध्यक्ष शशिकांत आमने यांनी लऊळ (माढा) येथे दैनिक सकाळशी बोलताना व्यक्त केले.

ते बार्शी येथे कार्यक्रमासाठी जात असताना लऊळ येथे एस. बी. सी. संघर्ष समितीच्या वतीने सत्कार करण्यात आला यावेळी बोलत होते. यावेळी एस. बी. सी. जिल्हा संपर्कप्रमुख अशोक हजारे, राज्य कार्यकारिणी सदस्य श्रीकांत वाघावकर, देविदास बाबर, प्रभाकर मुकरे जावळा, जयंत टकले करकंब, मनोज विधाते टेंभुर्णी, एस बी. सी. संघर्ष समितीचे लऊळ शाखा उपाध्यक्ष शंकर नकाते, तालुका सचिव संतोष वाळुजकर, कालिदास जानराव, बाळासाहेब लंकेश्वर, किरण जानराव, गौतम जानराव सर्जेराव गणगे आदि उपस्थित होते.

ते पुढे बोलताना म्हणाले की राज्यात कोणाची सत्ता आमायची ते बहुजन ठरवणार आहेत. आम्ही राज्यात 46 जातीच्या बरोबर घेऊन जात असताना राज्यातल्या विधानसभा सभेच्या सर्व जागा लढविणार असल्याचे सांगितले निधान आम्हाला निवडुण येता नाही आलेतर चालेल पण कोणाला पाडायचे हे करता येते.

राज्याचे ओबीसीचे नेते व आमदार छगन भुजबळ व वंचित बहुजन आघाडीचे नेते बाळासाहेब आंबेडकर यांच्या बरोबर दिर्घ काळ चर्चा झाल्या असुन, इचलकरंजी येथे राज्यस्तरीय अधिवेशन आयोजित केले आहे. त्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, छगन भुजबळ, प्रकाश आंबेडकर व अन्य नेतयांना आमंत्रित केले आहे. या अधिवेशना नंतर संघटनेची दिशा ठरेल.
- शशिकांत आमने, संस्थापक अध्यक्ष एस. बी. सी. संघर्ष समिती

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com