मिरज : मिरज-पुणे रेल्वे मार्गावरील नांद्रे येथील रेल्वे पुलाचा भराव अतिवृष्टीमुळे वाहून गेल्याने हा मार्ग 23 ऑक्टोबरपर्यंत वाहतुकीस बंद राहणार असल्याचे आज मध्य रेल्वेकडून जाहीर करण्यात आले. पुलाच्या दुरुस्तीच्या कामाची मध्य रेल्वेच्या व्यवस्थापिका रेणु शर्मा यांनी आज (सोमवारी) पाहणी केली.
15 ऑक्टोबर (गुरुवारी) रोजी झालेल्या अतिवृष्टीत मिरज-पुणे रेल्वे मार्गावरील नांद्रे ते भिलवडी या रेल्वे स्थानकांदरम्यान येरळा नदीच्या नदीवर असलेल्या पुलाचा भराव मोठ्या प्रमाणात वाहून गेला. या मार्गाची निरीक्षण करणाऱ्या कर्मचाऱ्यास याची माहिती मिळताच त्याने नियंत्रण कक्षास कळवून वाहतूक बंद करण्यास सांगितले. त्यामुळे 15 ऑक्टोंबरपासून रेल्वे वाहतूक पूर्णपणे बंद झाली. नुकसानीच्या प्राथमिक अंदाजानंतर ही वाहतूक आजपासून (सोमवार) सुरू करण्याचे रेल्वे प्रशासनाचे नियोजन होते.
परंतु रेल्वे पुलाच्या नुकसानीचा आवाका मोठा असल्याने हे काम करण्यास रेल्वेच्या बांधकाम विभागास आणखी काही कालावधी लागणार असल्याचे बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. यासाठी रेल्वेच्या बांधकाम विभागाची यंत्रणा युद्धपातळीवर कार्यरत असल्याचेही रेल्वे सूत्रांकडून सांगण्यात आले.
आज रेल्वेच्या विभागीय व्यवस्थापिका मध्य रेल्वेच्या पुणे येथील विभागीय व्यवस्थापिका रेणू शर्मा यांनी या कामाच्या ठिकाणी भेट देऊन भेट देऊन अधिकाऱ्यांना सूचना दिल्या. त्यानंतर त्यांनी 23 ऑक्टोंबर पर्यंत ही वाहतूक बंद ठेवण्यात येणार असल्याचे सांगितले. रेल्वे प्रशासनाने आज 23 ऑक्टोबरपर्यंत मिरज-पुणे रेल्वे मार्गावरील वाहतूक बंद राहणार असल्याचे अधिकृतपणे जाहीर केले.
संपादन : प्रफुल्ल सुतार
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.