घरात पुराचे पाणी घुसल्याने दोघांचा हृदविकाराने मृत्यू; भरपाईसाठी सतेज पाटील भेटले मुख्यमंत्र्यांना

घरात पुराचे पाणी घुसल्याने दोघांचा हृदविकाराने मृत्यू; भरपाईसाठी सतेज पाटील भेटले मुख्यमंत्र्यांना

कोल्हापूर - महापुरामध्ये स्वतःचे घर गमावल्याचा धक्का सहन न झाल्याने कदमवाडीतील मुकुंद कोकाटे व गडहिंग्लज तालुक्यातील दुडंगे गावचे सोमगोंडा देसाईं यांचे हृदयविकाराने निधन झाले. यासाठी पूरग्रस्त नियमावलीनुसार यांना आर्थिक नुकसानभरपाई देण्याचे आदेश द्यावेत, अशी मागणी आमदार सतेज पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.

या संदर्भात त्यांनी ट्विट्द्वारे ही माहिती दिली आहे. श्री. पाटील म्हणाले, कोल्हापूर आणि पश्चिम महाराष्ट्रातील पूरग्रस्तांना मिळणाऱ्या सहाय्यता निधीमध्ये वाढ करण्यात यावी. शिवाय सहाय्य त्वरित मिळावे, यासाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेतली. त्यांच्यापुढे पश्चिम महाराष्ट्रातील सद्यस्थिती व मागण्या सविस्तरपणे मांडल्या.

श्री. पाटील म्हणाले, चंदगड तालुक्यामधील पूरग्रस्त गावांना मी भेटी दिल्या.पण, अजूनही कोणतेही वरिष्ठ अधिकारी येथे पोहचलेले नाहीत. किमान तीन दिवस जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जर गडहिंग्लज,चंदगड व आजरा येथे गेले तर पाणी ओसरल्यानंतरच्या उद्भवणाऱ्या आरोग्य समस्यांवर तात्काळ उपाययोजना करता येतील. 

श्री. पाटील, म्हणाले, चंदगडमधील कोवाड गावं ही एक मोठी बाजारपेठ आहे. त्यामुळे इथे साधारणपणे 200 व्यापारी हे जीएसटी भरणारे आहेत. त्यांची मागणी आहे की  तीन वर्षे जीएसटी माफ करावे. बिनव्याजी कॅश क्रेडिट द्यावे. वीजबिल माफ करावे. शेतीची झालेली नुकसान भरपाई शासनाने द्यावीच सोबतच या वर्षीचे पीककर्ज शंभर टक्के माफ करावे. या त्यांचा मागण्या मान्य कराव्यात यासाठी मुख्यमंत्र्यांकडे निवेदन दिले आहे.  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com