पूरग्रस्तांना दुपटीने नुकसान भरपाई देण्याची गरज

पूरग्रस्तांना दुपटीने नुकसान भरपाई देण्याची गरज

पलूस - सांगली जिल्हा आणि पलूस तालुक्‍यातील महापुराने झालेल्या नुकसानी संदर्भातील सविस्तर माहिती महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे कार्याध्यक्ष आमदार विश्वजित कदम यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिली. जाहीर केलेल्या नुकसानभरपाईपेक्षा दुपटीने नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी आमदार डॉ. कदम यांनी निवेदनाद्वारे मुख्यमंत्र्यांकडे सकाळी प्रत्यक्ष भेटून केली. 

निवेदनात आमदार डॉ. कदम यांनी म्हटले आहे की, महापुराचा मोठा फटका सांगली जिल्हा आणि पलूस तालुक्‍यात बसला आहे. घरांची पडझड झाली आहे. घरातील संसार उपयोगी साहित्य, कपडे, भांडी यांचे नुकसान झाले आहे. महत्त्वाची कागदपत्रे, विद्यार्थ्यांचे शालेय साहित्य भिजून गेले आहे. शेतीचे तर पूर्ण नुकसान झाले आहे.

पलूस तालुक्‍यात महापुराने नागरिक, शेतकरी, शेतमजूर, छोटे मोठे उद्योग, व्यापारी यांचे न भरून येणारे नुकसान झाले आहे. शासनाने जाहीर केलेल्या नुकसान भरपाईपेक्षा दुपटीने नुकसान भरपाई द्यावी, शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी करावी, ज्यांची जनावरे मेली आहेत त्यांना भरीव मदत मिळावी, पडलेली घरे बांधून मिळावीत, विद्यार्थ्यांना शालेय साहित्य आणि गणवेश मिळावेत, शेतमजूर व व्यापारी यांना स्वतंत्र मदत मिळावी. पूरग्रस्त भागातील शाळा व इतर शासकीय इमारती, रस्ते यासाठी स्वतंत्र निधी देऊन दुरुस्ती करावी. अशा 15 मागण्यांचे निवेदन आमदार डॉ. विश्वजित कदम यांनी मुख्यमंत्र्यांना दिले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना, नुकसान, पुनर्वसन संदर्भात आराखडा, उपाययोजना, प्रत्यक्ष परिस्थितीची माहिती सासंदर्भातील आराखडाच सादर केला. मुख्यमंत्र्यांनी वस्तुस्थिती मान्य करून, आवश्‍यक त्या मदतीचे आश्वासन आमदार डॉ. कदम यांना दिले. 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com