Loksabha 2019 : मुख्यमंत्र्यांनी विखेंना ५००० कोटी दिले का? - राजु शेट्टी

Loksabha 2019 : मुख्यमंत्र्यांनी विखेंना ५००० कोटी दिले का? - राजु शेट्टी

सांगली - मुंबई विकास नियंत्रण आणि नगर नियमन नियामवलीत बदल करून मुख्यमंत्री देवेंद्र  फडणवीस यांनी दहा हजार कोटींचा घोटाळा केला आहे आणि त्यातला पाच हजार कोटींचा पहिला हप्ता त्यांना मिळाला आहे, असा गंभीर आरोप विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी केला होता. आता तोच वाटा सुजय विखे यांना देणार आहेत का, की त्या पैशातूनच विखेंना ते निवडून आणणार आहेत, याचा खुलासा करावा, अशी मागणी खासदार राजू शेट्टी यांनी येथे पत्रकार परिषदेत केली. 

मुख्यमंत्र्यांनी काल कोल्हापुरातील युतीच्या प्रचारसभेत शेट्टीं चोरांच्या आळंदीच्या वारीत सामील झाले आहेत, असा आरोप केला होता. त्यावर शेट्टी यांनी तुम्ही दरोडेखोरांच्या गुहेत वावरत आहात असा पलटवार केला.

ते म्हणाले, ‘‘हे सरकार पारदर्शकतेचा आव आणत आहे. मात्र त्यांचे घोटाळे आता दररोज एक बाहेर येतील. आगामी सहा महिन्यांत या साऱ्या भानगडी चव्हाट्यावर येतील.’’ 

गेल्या २६ डिसेंबरला विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी हा आरोप केला होता. मुख्यमंत्र्यांनी विखे-पाटील यांना नोटीसही काढली होती. त्यात त्यांनी पुरावे सादर करावेत, असे म्हटले होते. दरम्यानच्या काळात विखे-पाटील यांचे चिरंजीव सुजय यांनी भाजप प्रवेश केला आणि लोकसभेची उमेदवारीही जाहीर झाली. आता हे प्रकरण विखे-पाटील यांनी पाच हजार कोटींवर मिटवले का, असाही प्रश्‍न आहे. त्यातला काही वाटा तुम्ही विखेंना दिले हेही सांगावे. पन्नास कोटींच्या बदनामीच्या नोटिशीचे पुढे काय झाले हेही मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्राच्या जनतेला सांगावे. तुम्ही हा विषय सोडला  तरी आम्ही तो सोडणार नाही. पुराव्यांसह तो जनतेसमोर मांडला जाईल. ठरावीक बिल्डरांच्या सोयीसाठीच मुख्यमंत्र्यांनी नगरनियमावलीत बदले केले आहेत ते जनतेसमोर उघडे होतील.’’

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com