Sangli News : कोयनेच्या पाण्यासाठी वेळप्रसंगी खासदारकीचा राजीनामा देऊ; संजय पाटील

दुष्काळी स्थितीत लोक अडचणीत असताना कोयना धरणातून पाणी सोडण्याबाबत साताराचे पालकमंत्री आडमुठेपणा करत आहेत
Sanjay Patil
Sanjay PatilSakal

सांगली : जिल्ह्यात दुष्काळी स्थितीत लोक अडचणीत असताना कोयना धरणातून पाणी सोडण्याबाबत साताराचे पालकमंत्री आडमुठेपणा करत आहेत. मात्र कोयना धरणातील पाणी आमच्या हक्काचे आहे.

दान किंवा भीक देत नाही. यापुढे सांगली जिल्ह्याच्या आत्मसन्मानाला ठेच लावण्याचा प्रयत्न खपवून घेणार नाही. वेळ आली तर खासदारकी पणाला लावू, राजीनामा देऊ असा इशारा खासदार संजय पाटील यांनी आज दिला.

खासदार संजय पाटील यांनी आज पत्रकारांशी बोलताना कोयना धरणातून पाणी सोडण्याबाबत सातारा पालकमंत्री शंभूराजे देसाई घेत असलेल्या आडमुठ्या धोरणाचा निषेध केला. ते म्हणाले, दुष्काळी स्थितीत लोक अडचणीत असताना राजकारण करण्याच्या भूमिकेचा मी निषेध करतो.

यंदाच्या पावसाळ्यात जिल्ह्यात कमी पाऊस झाला आहे. त्यामुळे ऐन गणेशोत्सवाच्या काळात कृष्णा नदी कोरडी होती. कोयना धरणातून पाणी सोडण्यासाठी तब्बल १२ ते १५ दिवस विलंब लावला. दुष्काळात लोक अडचणीत असताना जिल्ह्याला वेठीस धरण्याचे काम काहीजण करत आहेत. राज्य सरकारमध्ये एकत्र काम करत असताना अशा प्रकारचे राजकारण करण्याच्या भूमिकेचा निषेध करतो.

खासदार पाटील म्हणाले, याबाबत मी राज्याचे उपमुख्यमंत्री तथा पाटबंधारे मंत्री देवेंद्र फडणवीस तसेच भाजपचे नेते अमित शहा यांच्याकडे तक्रार करणार आहे. सांगलीत कालवा समितीच्या बैठकीत झालेल्या निर्णयांच्या इतिवृत्तावर सांगली, कोल्हापूर आणि सोलापूरच्या पालकमंत्र्यांच्या स्वाक्षरी आहेत. मात्र सातारा पालकमंत्री शंभूराजे देसाई यांनी स्वाक्षरी केलेली नाही.

कोयना धरण कुणाच्या मालकीचे आहे का?

सांगलीला पाणी देण्यात अडथळे आणल्यावरून खासदार संजय पाटील यांनी 'कोयना धरण कोणाच्या मालकीचे आहे का?' असा संतप्त सवाल यावेळी उपस्थित केला. ते म्हणाले, आमच्या जिल्ह्यात राजकीय हस्तक्षेप करून जिल्ह्याच्या आत्मसन्माला आला ठेच लावण्याचा प्रयत्न खपवून घेणार नाही. सातारा पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी हा खोडसाळपणा केला आहे. त्यांचा आडमुठेपणा आहे. आमच्या हक्काचे पाणी आहे. दान किंवा भीक देत नाही. वेळ आली तर टोकाची भूमिका घेऊ. खासदारकी पणाला लावणार. कोयना धरण कोणाच्या मालकीचे आहे का?

पाटबंधारे मंत्र्यांनी अधिकार ताब्यात घ्यावेत

कोयना धरणातून पाणी सोडण्याचे अधिकार पाटबंधारे मंत्री म्हणून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ताब्यात घ्यावेत. त्यांनी अधिकाऱ्यांना आदेश द्यावेत. सातारा पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी यात हस्तक्षेप करू नये.

त्यांच्या सातबाऱ्यावर कोयना धरण नोंदलेले नाही. एकदा नव्हे तर दोन वेळा त्यांनी त्रास देण्याची भूमिका घेतलेली आहे. दुष्काळी स्थिती असल्याने पाणी हा लोकांच्या जिव्हाळ्याचा प्रश्न आहे. त्यामुळे आम्ही सर्वजण जाऊन पाटबंधारे मंत्र्यांना भेटणार आहे. त्यांनी हे सगळे अधिकार स्वतःकडे घ्यावेत. आमच्या जिल्ह्याला वेठीस धरणाऱ्या माणसाच्या माध्यमातून कुठल्या प्रकारचे नियोजन होऊ नये अशी मागणी करणार असल्याचे ते म्हणाले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com