‘‘आजचे युग स्मार्ट आहे. त्याप्रमाणे महिलादेखील स्मार्ट बनण्याचा प्रयत्न करतांना दिसतात. प्रत्येक क्षेत्रात स्मार्ट वुमन म्हणून स्वत:ची ओळख निर्माण करण्यात महिला यशस्वी झाल्या आहेत. महिलांनी एकमेकींचा आत्मविश्वास वाढविण्यासाठी प्रयत्न करावेत, ’’ असे मत इचलकरंजीच्या लोकनियुक्त नगराध्यक्षा ॲड. सौ.अलका स्वामी यांनी व्यक्त केले.
इचलकरंजीत स्वामी घराण्याला समृद्ध राजकीय वारसा आहे. नगराध्यक्षा ॲड. सौ. स्वामी तो सक्षमपणे चालवत आहेत. महिलांच्या कर्तुत्वाबाबत ‘सकाळ‘शी बोलताना नगराध्यक्षा ॲड. सौ. स्वामी म्हणाल्या, ‘‘एक काळ असा होता, महिलांचे विश्व चार भिंतीच्या आतमध्येच होतं. क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या धाडसी प्रयत्नातून महिला शिकल्या आणि सर्वच महिलांच्या प्रगतीची दारे खुली झाली. आज असे एकही क्षेत्र नाही, ज्यात महिला चमकली नाही. जिथे संधी मिळाली तिथे स्त्रियांनी सोनं केले आहे. राजकीय, व्यावसायिक आणि सामाजिक क्षेत्रात आपल्या कर्तृत्वाचा ठसा महिलांनी उमटविला आहे.’’
त्या म्हणाल्या, ‘‘मुळात महिलांत जिद्द, आत्मविश्वास, चिकाटी हे गुण आहेत. त्यामुळे अवघड जबाबदारी अथवा बिकट वाट जरी असली ती कशी पार करायची याचा आत्मविश्वास महिलांकडे निर्माण झाला आहे. विविध स्पर्धातून त्यांच्या गुणांची ओळख होऊ लागली. स्पर्धामुळे महिलांच्या सक्षमतेला अधिक वाव मिळत आहे.’’
आरोग्याबाबत त्या म्हणाल्या, ‘‘महिलांना एक सांगावेसे वाटते की, सर्व धावपळीत त्या स्वत:च्या आरोग्याकडे दुर्लक्ष करतात. त्यामुळे स्वतःसाठी थोडा तरी वेळ द्यावा. स्त्रीचे आरोग्य चांगले असेल, तर त्या कुटुंबाचे आरोग्य चांगले राहते. स्वतःचे मानसिक स्वास्थ्य बिघडू देऊ नये. महिला सक्षमीकरणासाठी पालिकेच्या माध्यमातून विविध योजना राबविल्या.’’
त्या म्हणाल्या, ‘‘महिलांनी स्वावलंबी बनणे आवश्यक आहे. महिला नुसते घर काम करीत असेल तर तिला महत्त्व दिले जात नाही; पण तीच महिला जर नोकरी करू लागली तर तिचा मान सन्मान वाढतो. पण हे करीत असताना स्वत:च्या कुटुंबाकडे दुर्लक्ष करू नये. कुटुंबाची जबाबदारी पार पाडण्याची आवश्यकता आहे. महिलांना राजकारणात क्षेत्र उपलब्ध झाले आहे. त्यामध्ये देखील अतिशय प्रभावीपणे महिला काम करीत आहेत. जरी त्या राजकारणात असल्या तरी त्या प्राधान्याने समाजकारणावर जास्त भर देत असल्याचे दिसून येते.’’
ॲड. सौ. स्वामी म्हणाल्या, ‘‘इचलकरंजीतील प्रत्येक महिला ही स्मार्ट वुमन बनली पाहिजे असे माझे ध्येय आहे. त्यासाठी पालिकेच्या माध्यमातून आम्ही उद्यानामध्ये ओपन जीम बसविले आहेत. महिला महोत्सव हे महिलांच्या कला-गुणांना वाव देण्यासाठी व्यासपीठ आहे. दरवर्षी होणाऱ्या महोत्सवात महिलांनी जास्तीत जास्त सहभागी होण्याची गरज आहे. यातून त्यांच्या अंगी असलेल्या कला-गुणांना वाव मिळतो.’’
नगराध्यक्षा स्वामी म्हणाल्या
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.