सांगली ः महात्मा जोतिबा फुले शेतकरी सन्मान योजनेंतर्गत जिल्ह्यातील 74 हजार 170 शेतकऱ्यांना 422.32 कोटी कर्जमाफी मिळाली. उर्वरित 9 हजार शेतकरी कर्जमाफीपासून वंचित राहिले आहेत. हे शेतकरी कर्जमाफीची प्रतीक्षा करू लागलेत. आम्हाला कर्जमाफीचा लाभ मिळणार का? असा देखील प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे.
महाआघाडी सरकारने महात्मा फुले शेतकरी कर्जमाफी योजना जाहीर केली. त्याअंतर्गत जिल्ह्यातील 86 हजार 959 शेतकरी पात्र ठरले. त्यानंतर त्यांचे "आपले सरकार' कडून 80 हजार 506 शेतकऱ्यांची माहिती अपलोड करण्यात आली. 74 हजार शेतकऱ्यांचे प्रमाणीकरण करण्यात झाले. जिल्ह्यातील 74 हजार 140 शेतकऱ्यांचे प्रमाणीकरण झाले. त्यापैकी 71 हजार 426 शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळाला. अर्थात 2 हजार 774 शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरण होऊन देखील कर्जमाफीचा लाभ मिळाला नाही. त्यामुळे या शेतकऱ्यांना कर्जमाफीची प्रतीक्षा करावी लागत आहे. थकबाकी असल्याने या शेतकऱ्यांना नवीन कर्ज मिळत नसल्याने शेतकऱ्यांत नाराजीचे वातावरण आहे.
सहा हजार जणांचे प्रमाणीकरण बाकी
एका बाजूला कर्जमाफी मिळेल या आशेने शेतकऱ्यांची कर्जाची परत फेड केलेली नाही. त्याच दुसरीकडे जिल्ह्यात सहा हजार शेतकऱ्यांचे प्रमाणीकरण संबंधित विभागाने अद्यापही झालेले नाही. यामुळे जिल्ह्यातील सहा हजार शेतकऱ्यांचे प्रमाणीकरण बाकी आहे. हे प्रमाणीकरण कधी पूर्ण केले जाणार आणि कर्जमाफीचा लाभ कधी मिळणार असा प्रश्न शेतकरी उपस्थित करू लागले आहे.
दृष्टिक्षेप कर्जमाफी
संपादन : युवराज यादव
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.