तासगाव तालुक्यातील पाडळी यात्रा आतषबाजीविना

तासगाव तालुक्यातील पाडळी यात्रा आतषबाजीविना

विसापूर - तासगाव तालुक्‍यातील पाडळी येथील यात्रेत शोभेच्या दारूची आतषबाजी व फटाके न उडविण्याचा निर्णय यात्रा समितीने घेतला आहे. फटाक्‍याने होणारे प्रदूषण टाळण्यासाठी गावकऱ्यांनी हा क्रांतिकारी निर्णय घेतला आहे. तब्बल ४५ वर्षांची परंपरा मोडून गावकऱ्यांनी न्यायालयाच्या आदेशाचे पालन तर केलेच शिवाय एक वेगळा नवा अध्याय इतर गावासमोर ठेवला आहे.

यात्रा समितीच्या आवाहनाला युवकांनी प्रतिसाद दिल्यामुळे आता पाडळी हे  जिल्ह्यातील एकमेव प्रदूषणमुक्‍त गाव ठरले आहे. या निर्णयामुळे गावाचे सात ते आठ लाख रुपये वाचले आहे.

येथील ग्रामदैवत सिद्धनाथाची (ता. २१) पासून  यात्रा सुरू होत आहे. पारायण सोहळ्यानंतर यात्रा मोठ्या प्रमाणात भरते. देशभरात विखुरलेले गलाईबांधव यानिमित्ताने आवर्जून येतात. पालखी मिरवणूक व कुस्ती मैदान हे यात्रेचे मुख्य वैशिष्ट्ये आहे. यात्रेच्या पहिल्या दिवशी सायंकाळपासून सिद्धनाथाची पालखी मिरवणूक सुरू होते. ती अखंड रात्रभर गावातून फिरते.
पालखीसमोर वेगवेगळी वाद्य असतात. गुलालाची प्रचंड उधळण होते. तर सुमारे सात ते आठ लाखांपर्यंतची शोभेच्या दारूची आतषबाजी होते. अनेक प्रकारचे  फटाके फोडले जातात. मिरवणूक संपेपर्यंत म्हणजे सकाळपर्यंत ही आतषबाजी होते. अख्खे गाव प्रदूषण व धुराने रात्रभर त्रस्त होते. 

दरम्यान, उच्च न्यायालयाने फटाक्‍यांवर बंदी घातली. पर्यायाने फटाके उडविण्यावर निर्बंध आले. मात्र, तरीही आतषबाजीवर काहीजण ठाम होते. अखेर यात्रा समिती व युवकांनी बैठक घेतली. प्रदूषण होणारच शिवाय लाखो रुपयांची विनाकारण उधळण होईल अशी चर्चा झाली. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com