Coronavirus : सातारा जिल्ह्यात काेराेनाचा दूसरी बळी; बाधितांची संख्या झाली सात

Coronavirus : सातारा जिल्ह्यात काेराेनाचा दूसरी बळी; बाधितांची संख्या झाली सात

कराड : महारुगडेवाडी (ता. कराड) येथील कृष्णा रुग्णालयात दाखल असलेल्या काेराेना बाधित रुग्णाचा आज पहाटे (शनिवार) मृत्यू झाला. सातारा जिल्ह्यातील काेराेना बाधिताचा हा दूसरा बळी ठरला आहे. तर कराड तालुक्यात कोरोना बाधितचा पहिला झाल्याने नागरीकांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे. दरम्यान प्राथमिक अंदाजानुसार कोविड-19 सह श्वसन संस्थेच्या जंतू संसर्गामुळे आणि मधुमेहामुळे मृत्यू झाला असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली आहे.

कराड तालुक्यातील महारुगडे वाडी येथील संबंधित व्यक्ती मुंबई येथे वास्तव्यास होती. ती व्यक्ती आपल्या नातेवाईक रिक्षांमधून मुलीसह दोन नातवंडा बरोबर गावाकडे आली होती. त्यानंतर त्यांना त्रास होत असल्याने ही व्यक्ती जवळपासच असलेल्या एका खासगी रुग्णालयात गेली असता या व्यक्तीची लक्षणे कोरोना सदृश असल्याने खासगी डॉक्टरांनी त्यांना तपासणी करण्याचा सल्ला दिला. त्यानंतर सदर व्यक्तीने दुसऱ्या एका खाजगी रुग्णालयात जाऊन तात्पुरती उपचार घेतले. तरीही त्रास वाढत असल्याने मागील चार दिवसापूर्वी ही व्यक्ती कराड येथील कृष्णा रुग्णालयात दाखल झाली त्याच्या घशातील स्त्रावाचे नमुने पुणे येथे पाठवले हाेते. त्याचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता. त्यांच्यावर उपचार सुरु हाेते. मात्र आज (शनिवार) त्यांचा मृत्यू झाला. संबंधितांवर येथील वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.  प्रशासनाकडून त्याची सध्या तयारी सुरू आहेत.

दरम्यान कोरोना बाधित रुग्णाच्या निकट सहवासीत 13 जणांना फलटण तालुक्यातील क्वारंटाईन फॅसिलिटी केंद्रामध्ये  व श्वसन संस्थेच्या जंतू संसर्गामुळे अशा विविध आजारांमुळे 11 अनुमानितांना शासकीय रुग्णालयातील विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आले होते. या सर्व 24 जणांचे  घाशातील स्त्रावांचे नमुने बी. जे. वैद्यकीय महाविद्यालय, पुणे येथे तपसणीसाठी पाठविण्यात आले होते.
या सर्व 24 अनुमानितांचे रिपोर्ट निगेटिव्ह असल्याचे बी.जे. वैद्यकीय महाविद्यालय, पुणे यांनी कळविले आहे, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली आहे.

दुबईहून आलेली महिला झाली कोरोना मुक्त; 39 संशयितांच्या अहवालांची अद्याप प्रतीक्षा

लाकडे जमविण्यापासून ते सरण रचण्यापर्यंत प्रशासनाला कसरत करावी लागली. अंत्यसंस्कार गाडीसाठीही बराच वेळ खोळंबा झाला. सविस्तर वाचा या लढ्याविषयी 

दरम्यान कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता सातारा जिल्ह्यात कडक प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून जिल्ह्यतील अत्यावश्यक बाबी वगळता सर्व प्रकारची दुकाने व आस्थापना पुढील आदेशापर्यंत बंद राहतील तर अत्यावश्यक सेवेची चालू असणारी सर्व दुकाने ठरविक वेळेत सुरु राहतील, असे आदेश जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी दिले.

जिल्हाधिकाऱ्यांच्या या आदेशानुसार कोरोना प्रादुर्भावानंतर  अत्यावश्यक सेवेची चालू ठेवलेली सर्व दुकाने उदा. किराणा सामान, दुध, औषध दुकाने, कृषि सेवा केंद्रे व अन्य जीवनावश्यक वस्तूंची दिनांक 11 एप्रिल पासून पुढील आदेशापर्यंत रोज सकाळी 8 ते सकाळी 11 वाजेपर्यंत, व सायंकाळी 7 वाजल्यापासून ते 9 वाजेपर्यंतच चालू राहतील. तथापि भाजीपाला विक्री केंद्रे फक्त सकाळी 8 ते 11 या वळेतच चालू राहतील. भाजीपाला केंद्रे संध्याकाळी चालू राहणार नाहीत. 

या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांविरुध्द नियमानुसार कडक कारवाई करण्यात येऊन संबंधितांचा परवाना तात्काळ कायमस्वरुपी रद्द करण्यात  येवून साथरोग प्रतिबंधात्मक कायद्यानुसार, दंड प्रक्रीया संहिताचे कलम 144, आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 या आदेशाचे उल्ल्ंघन केल्यास भारतीय दंड संहिता कलम 188 नुसार शिक्षेस पात्र असलेला अपराध केला असे मानण्यात येईल. व संबंधितांवर कारवाई करण्यात येईल, असेही आदेशात नमुद आहे.

सातारा जिल्ह्यातील नागरीकांसाठी जिल्हाधिकारी शेखर सिंह यांचा महत्वपुर्ण निर्णय

कोरोना विषाणूचा वाढता संसर्ग लक्षात घेऊन त्यात अधिक वाढ होऊ नये यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून जिल्ह्यातील सर्व शासकीय निमशासकीय अधिकारी कर्मचारी यांच्यासह भेट देणारे अभ्यांगत तसेच अत्यावश्यक बाबी व सेवांसाठी बाहेर फिरणाऱ्या नागरीकांनी मास्क चेहऱ्यावर परिधान करणे बंधनकारक आहे, असे आदेश जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी दिले आहे.

कोरोना (कोविड-19) विषाणूचा प्रसार राज्यातील कार्यालयामधील अधिकारी व कर्मचारी यांना संसर्ग होऊ नये म्हणून शासनाकडून प्रतिबंधात्मक उपाययोजनांबाबत आदेश निर्गमित करण्यात आले आहेत. या पार्श्वभूमीवर मुंबई व पुणे महानगर प्रादेशिक विकास क्षेत्रात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढता विचारात घेता, सातारा जिल्ह्यातील सर्व शासकीय निमशासकीय, नगरपालिका, नगरपंचायत, महामंडळे, सार्वजनिक उपक्रम व इतर सर्व कार्यालयातील सर्व अधिकारी कर्मचारी यांच्यासह कामानिमित्त भेट देणाऱ्या सर्व अभ्यागतांनादेखील कार्यालयीन प्रवेशापासून ते कार्यालय सोडेपर्यंतच्या संपूर्ण कालावधीमध्ये चेहऱ्यावर मास्क परिधान करणे बंधनकारक करण्यात आले आहे. मास्कशिवाय कोणालाही कार्यालयात प्रवेश देण्यात येणार नाही, अशा स्पष्ट सूचना या आदेशाद्वारे देण्यात आल्या आहेत. 


याच धर्तीवर सातारा जिल्हयातील सर्व शहरी व ग्रामीण भागातील नागरिकांनी अत्यावश्यक बाबी व सेवा उपलब्ध करुन घेण्यासाठी घरामधून बाहेर पडतानापासून परत घरी येईपर्यंतच्या संपूर्ण कालावधीमध्ये चेहऱ्यावर मास्क परिधान करणे बंधनकारक राहील. याचे उल्लंघन करताना निदर्शनास आल्यास पोलीस प्रशासनाने नियमानुसार संबधितांवर कायदेशीर कारवाई करावयाची आहे, असेही आदेशात नमुद आहे. 

तसेच सर्व शासकीय कार्यालयांमध्ये असणाऱ्या कर्मचाऱ्यांनी काम करत असताना कागदपत्रे व हस्तांदोलन यामुळे संसर्ग वाढण्याची  शक्यता नाकारता येत नसल्याने कार्यालयाममध्ये वेळोवेळी सॅनिटायझर अथवा हॅण्डवॉशचा वापर करावा, असे आवाहनही जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी केले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com