सोलापूर : राज्यातील एक लाख 60 हजार शेतकऱ्यांसाठी कांदा अनुदानाचे 114 कोटी 80 लाख रुपये राज्य सरकारने शनिवारी पणन विभागाला वर्ग केले आहेत. आता ही रक्कम गुरुवार, 21 फेब्रुवारीपासून शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यात जमा होणार असल्याची माहिती पणन विभागाने दिली.
1 नोव्हेंबर ते 15 डिसेंबर या कालावधीत राज्यातील 71 बाजार समित्यांत पाच लाख 70 हजार शेतकऱ्यांनी कमी किमतीने कांदा विकला. परंतु, कागदपत्रे अपूर्ण असल्याने त्यापैकी तब्बल चार लाख शेतकरी अपात्र ठरले. त्यानंतर 15 ते 31 डिसेंबर या कालावधीत कांदा विकलेल्या शेतकऱ्यांनी 15 फेब्रुवारीपर्यंत अर्ज केले. आता 31 जानेवारीपर्यंत कांदा विकलेल्या शेतकऱ्यांना 22 फेब्रुवारीपर्यंत अर्ज करण्याची मुदत देण्यात आली आहे. या कालावधीत कांदा विकलेल्या शेतकऱ्यांना उत्पन्नापेक्षा खूपच कमी रक्कम पदरात पडली. मात्र, शेतकऱ्यांच्या सात-बारा उताऱ्यावर पीकपेऱ्याची नोंद नसल्याचा भुर्दंड बळीराजाला सोसावा लागतोय. दुष्काळात रब्बी व खरीप वाया गेलेल्या शेतकऱ्यांना अनुदान स्वरूपात चार पैसे पदरात पडतील, अशी आशा अद्यापही आहे.
कमी किमतीने बाजार समित्यांत कांदा विक्री करूनही कागदपत्रे अपूर्ण असल्याने राज्यातील सुमारे चार लाख शेतकरी कांदा अनुदानासाठी अपात्र ठरले आहेत. त्यानंतर आता 15 डिसेंबर ते 31 जानेवारी या कालावधीत कांदा विकलेल्या एक-दीड लाख शेतकऱ्यांचा त्यात नव्याने समावेश होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांची मागणी असताना सरकारकडून काहीच निर्णय घेण्यात आलेला नाही. अपात्र ठरलेल्या शेतकऱ्यांना सरकारकडून अद्यापही अनुदानाची आशा आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.