सांगली : ४६ हजार ग्राहकांना पुनर्जोडणीची संधी

कायम वीज खंडित असलेल्यांना लाभ; ‘विलासराव देशमुख अभय योजने’तून २५.६१ कोटींची सवलत
MSEDCL sangli
MSEDCL sanglisakal

सांगली - सांगली जिल्ह्यातील कायमस्वरुपी वीजपुरवठा खंडित असलेल्या लघु व उच्चदाब वर्गवारीतील ४६ हजारांवर अकृषक ग्राहकांना ‘विलासराव देशमुख अभय योजने’मधून वीज पुनर्जोडणीची संधी उपलब्ध झाली आहे. जिल्ह्यातील ४६ हजार ४९ ग्राहकांनी ५७ कोटी २२ लाख रुपयांचा भरणा केल्यास व्याज व विलंब आकाराची २५ कोटी ६१ लाख रुपयांची माफी मिळणार आहे.

वीज बिलांच्या थकबाकीमुळे ३१ डिसेंबर २०२१ पूर्वी कायमस्वरुपी वीजपुरवठा खंडित झालेल्या उच्च व लघुदाब वर्गवारीतील घरगुती, वाणिज्यिक, औद्योगिक व इतर अकृषक ग्राहकांसाठी थकबाकीमुक्तीसह वीजजोडणी पुन्हा कार्यान्वित करण्यासाठी ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी ‘विलासराव देशमुख अभय योजना’ जाहीर केली आहे.

योजनेत सहभागी होऊन मूळ थकबाकी एकरकमी भरल्यास उच्चदाब ग्राहकांना ५ टक्के; तर लघुदाब ग्राहकांना १० टक्के सवलत मिळणार आहे. मूळ थकबाकी भरण्यासाठी सहा मासिक हप्त्यांची सोय असून त्यासाठी ३० टक्के थकबाकीचा भरणा करून योजनेत सहभाग घेणे आवश्यक आहे. हप्त्यांनी मूळ थकबाकी भरीत असलेल्या ग्राहकाचा वीजपुरवठा सुरू केल्यानंतर चालू बिलाच्या रकमेसोबत हप्त्याची रक्कम भरणे अनिवार्य आहे. ग्राहकांनी उर्वरित हप्त्यांची रक्कम भरली नाही, तर माफ केलेल्या व्याज व विलंब आकाराची रक्कम पूर्ववत लागू होणार आहे. आतापर्यंत या योजनेत पुणे जिल्ह्यातील ८१७, सातारा-१२० सोलापूर- १६६, कोल्हापूर- ९९ आणि सांगली जिल्ह्यातील १०४ अशा १३०६ ग्राहकांनी भाग घेतला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com