Sangli:जिल्ह्यातील ६ गावांत पाणी दूषित; मिरज तालुक्यातील पाच, आटपाडीतील एका गावाचा समावेश, आराेग्य धाेक्यात..

दहा तालुक्यांमधील गावांमध्ये १६६३ ठिकाणचे पाण्याचे नमुने तपासले होते. त्यामध्ये मिरज तालुक्यातील पाच आणि आटपाडी तालुक्यातील एक अशा सहा गावांमध्ये पाणी दूषित आढळून आले.
Residents collect drinking water in affected villages of Miraj and Atpadi, where water contamination poses health risks.
Residents collect drinking water in affected villages of Miraj and Atpadi, where water contamination poses health risks.Sakal
Updated on

सांगली : मिरज तालुक्यातील पाच गावांसह जिल्ह्यातील सहा गावांतील पाणी पिण्यायोग्य नसून ते दूषित झाले आहे. त्यामध्ये आटपाडी तालुक्यातील एक गावाचा समावेश आहे. जिल्हा परिषदेतर्फे प्रत्येक महिन्याला पाणी व टीसीएल तपासणी अहवाल प्रसिद्ध केला जातो. एप्रिलचा पाणी व टीसीएल तपासणी अहवाल प्राप्त झाला आहे. यामध्ये मिरज तालुक्यातील बेळंकी, सलगरे, गुंडेवाडी, नांद्रे, बेडग आणि आटपाडी तालुक्यातील बनपुरी या सहा गावांतील पाण्याचे नमुने दूषित असल्याचे अहवालात नमूद केले आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com