शेतकरी आत्महत्यांची जबाबदारीही पवारांनी स्वीकारावी

शेतकरी आत्महत्यांची जबाबदारीही पवारांनी स्वीकारावी



सोलापूर ः शेती उद्योगातील क्रांतीचे श्रेय घेत असतानाच शेतकऱ्यांच्या आत्मह्त्यांची जबाबदारीही शरद पवार यांनी स्वीकारावी, अशी मागणी शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथ पाटील यांनी केली. 

मोदी नेहरूंचा वारसा चालवत आहेत 
श्री. पाटील गुरुवारी सोलापुरात आले होते. त्यावेळी ते पत्रकारांशी बोलत होते. श्री. पाटील म्हणाले, राज्य सरकारमधील नाव बदलली आहेत. बाकीचे सर्वकाही तसेच आहे.
शेतकरी बदलली जात आहेत, धोरणे मात्र तीच कायम आहेत. पंडीत नेहरूंनी जी शेतकरी विरोधी भूमिका घेतली, तोच वारसा पंतप्रधान नरेंद्र मोदी पुढे चालवित आहेत. 

शेतकऱ्यांच्या समस्या सोडविण्यात अपयश
शरद पवार जाणते राजे आहेत. पन्नास वर्षे राजकारणात आहेत. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर सुरवातीची पंधरा वीस वर्षे शेतकर्यांच्या आत्महत्या नव्हत्या. गेल्या 40 वर्षांत पवार राजकारणात  आले, तसे शेतकऱ्यांच्या आत्महत्येचे प्रकार वाढले. विकासकामांचा मोठेपणा ते जसे घेतायेत, आम्ही मोठेपणा द्यायला तयार आहोत. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या समस्या सोडविण्यात त्यांना अपयश आले आहे. शेतकऱ्यांच्या आत्महत्येचे पाप हे त्यांचेच आहे, असेही पाटील म्हणाले.

स्वामीनाथन आयोगाचा आग्रह का नाही 
महाराष्ट्राच्या राजकारणात गेली 50 वर्षे सक्रीय असलेल्या पवार याना विविध कामांचे मोठेपण दिले जात आहे. मात्र शेतकऱ्यांच्या आत्महत्येची जबाबदारी मात्र ते घेत नाहीत. शेतकऱ्यांच्या प्रश्नावर त्यांनी कधी आक्रमक भूमिका घेतली आहे का, स्वामीनाथन आयोग शिफारसी लागू करण्यासाठी आग्रही भूमिका का घेतली नाही. पवार प्रगतीचे श्रेय घेत असतील तर शेतकरी आत्महत्येचं पापही स्वीकारलं पाहिजे. अन्यथा शेतकऱ्यांच्या आत्महत्येचे पाप कोणाचे हे तरी सांगितले पाहिजे, असेही रघुनाथ पाटील म्हणाले.


 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com