पावणेदोनशे कुटुंबे उघड्यावर

तांबवे - जुनी मातीची घरे पडून कुटुंबांच्या निवाऱ्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.
तांबवे - जुनी मातीची घरे पडून कुटुंबांच्या निवाऱ्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.

जिल्ह्यात महापुराचा २८९५ घरांना दणका; पाच तालुक्‍यांतील दहा हजार ७५५ नागरिक विस्थापित
सातारा/कऱ्हाड - अतिवृष्टीमुळे निर्माण झालेल्या पूरसदृश स्थितीमुळे कऱ्हाड, पाटण, महाबळेश्वर, वाई आणि सातारा तालुक्‍यांतील पावणेदोनशे कुटुंबांच्या निवाऱ्याचा प्रश्न निर्माण झाला असून, जिल्ह्यातील दोन हजार ८९५ घरांचे नुकसान झाल्याचे पंचनाम्यातून समोर आले आहे. त्यात पावणेदोनशे कच्ची घरे पूर्णत: बाधित आहेत. पूर कालावधीत विस्थापित केलेल्या कुटुंबांची संख्या १२३ असून, पूर्णत: बाधित कुटुंबांची संख्या दोन हजार ४८० आहे, तर एकूण दहा हजार ७५५ नागरिकांना विस्थापित करण्यात आले होते, तसेच कऱ्हाड तालुक्‍यातील २१०० कोंबड्या पुरामुळे मृत झाल्या आहेत. मोठी १५ आणि लहान सात जनावरांचा मृत्यू झाला आहे. पुराच्या फटक्‍यात उद्‌ध्वस्त झालेल्यांचे संसार नव्याने उभारण्याचे आव्हान जिल्हा प्रशासनापुढे आहे.

अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील पश्‍चिमेकडील तालुक्‍यात पूरसदृश्‍य स्थिती निर्माण होऊन अनेक गावांत पाणी घुसले. अनेक घरांत पाणी घुसल्याने कऱ्हाड- पाटण तालुक्‍यांत तर गावेच्या गावे स्थलांतरित करावी लागली. आठवडाभर निसर्गाचे हे रौद्ररूप सुरूच होते. त्यामुळे अनेक दिवस जुनी मातीची, कुडामेडाची आणि चांगली घरेही पाण्यात राहिली. त्यामुळे त्या घरांना धोका निर्माण झाला आहे. अनेक घरे डोळ्यादेखत कोसळत आहेत.

अनेक जुन्या मातीच्या घरांच्या भिंती कोसळून नुकसान होत आहे, तर अनेकांची घरे कधी कोसळतील याचा नेमच राहिलेला नाही. पूरग्रस्त गावात रोज दोन- चार घरे कोसळत आहेत. त्यामुळे मातीच्या घरात राहूच शकत नाही अशी स्थिती निर्माण झाली आहे. तीच स्थिती कुडामेडांच्याही घरांची झाली आहे. काही गावांत तर पत्र्यासकट छत वाहून गेले आहेत. त्यामुळे तेथील लोकांच्या निवाऱ्याचा प्रश्न निर्माण झाला असून, ते निवारा शोधत आहेत. काहींनी तर सामाजिक सभागृह, मंदिरात आसरा घेतला आहे. ती घरे उभी करण्याचे आव्हान जिल्हा प्रशासनापुढे आहे.

समाजातील दानशूरांना साद 
महापुराने बाधित झालेल्या घरांच्या पडझडीचे व पूर्णतः नुकसान झालेल्या घरांच्या पंचनाम्याचे काम सध्या गावोगावी सुरू आहे. त्यात बाधित घरांची संख्या वाढणार आहे. संबंधित घरांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे तो खर्च करायचा कोठून हा प्रश्न सध्या पूरग्रस्तांसमोर आहे. शासनाकडून मिळणाऱ्या मदतीत घर उभारता येत नाही हे सर्वज्ञात आहे.

मात्र, त्या तुलनेत खर्च लाखोंच्या घरात आहे. त्यामुळे समाजातील दानशुरांना संबंधित पूरग्रस्तांना घर उभारणीत मदत करण्यासाठी ही एक सादच आहे. पूर कालावधीमध्ये विस्थापित केलेल्या कुटुंबांची संख्या १२३ असून, पूर्ण बाधित कुटुंबांची संख्या दोन हजार ४८० आहे, तर एकुण दहा हजार ७५५ नागरिकांना विस्थापित करण्यात आले होते, तसेच कऱ्हाड तालुक्‍यातील २१०० कोंबड्या पुरामुळे मृत झाल्या आहेत. मोठी १५ आणि लहान सात जनावरांचा मृत्य झाला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com