कोल्हापूरच्या विकासाचे व्हिजन

कोल्हापूरच्या विकासाचे व्हिजन

ऋतुराज पाटील यांनी आज ‘सकाळ’शी संवाद साधला. सध्या ते जरी परदेशात असले तरीही मोबाईलवरून त्यांनी आपली सविस्तर भूमिका स्पष्ट केली. या वेळी पाटील म्हणाले, की आपण परदेशात पाहतो, लोकांना स्वयंशिस्त आहे. त्यामुळे वाहतूक पोलिसांची येथे गरज नाही. प्रत्येक जण शिस्त पाळून पुढे जातो. अशा प्रकारची शिस्त लावून घेण्यासाठी आपण प्रयत्न करायला हवेत. त्याची सुरवात स्वतःपासून करायला हवी. शहर विकासासाठी सर्वांचे योगदान महत्त्वाचे आहे. आपले शहर म्हणजे आपले घर आहे. यादृष्टीने प्रत्येकाने पाहण्याची गरज आहे. कोल्हापूरचा विकास व्हायचा असेल तर अंबाबाई मंदिर केंद्रस्थानी ठेवून त्यादृष्टीने प्रयत्न व्हावा. पायाभूत सुविधा कशा वाढतील यासाठी राजकीय ताकद पणाला लावायला हवी.

देशपातळीवरची आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरची शैक्षणिक विद्यापीठे कोल्हापूरला आली तर अनेक जिल्ह्यांतील, राज्यांतील विद्यार्थी येथे शिक्षणासाठी, नोकरीसाठी येतील. त्याचा फायदा निश्‍चित कोल्हापूरला होईल. कोल्हापुरात पंचतारांकित हॉटेल नाही म्हणून अनेक उद्योग येत नव्हते. अनेक प्रकारचे अडथळे येत होते. त्यामुळे ही उणीव भरून काढण्यासाठी हे हॉटेल आम्ही सुरू केले आहे. त्यातून पाच वर्षे आम्हाला नफा होणार नसला तरी शहरात एक चांगली सुविधा निर्माण करणे हाच आमचा उद्देश होता.

शहराचा विकास व्हायचा असेल तर व्हिजन क्रिएट करूनच आम्ही पुढे आले पाहिजे. शिर्डी येथे तेथील मंदिरामुळेच प्रगती साधली गेली. त्याच धतींवर आपणही शहर विकासासाठी प्रयत्न केले पाहिजेत. शैक्षणिक विद्यापीठे येथे येण्याची गरज आहे. पण, सरकारने त्याला प्रोत्साहन दिले पाहिजे. त्यांना अपेक्षित स्वातंत्र्य दिले पाहिजे, तरच येथे येण्याचे धाडस ते करतील. कोल्हापूर हे एक चांगले पर्यटनस्थळही आहे. पण, प्रशिक्षित गाईड नसल्याने पर्यटकांना माहिती मिळत नव्हती. यासाठी मी स्वतः शिवाजी विद्यापीठाच्या कुलगुरूंशी बोललो आणि त्यांनी ती उणीवही भरून काढली असून, तेथे प्रशिक्षित गाईड करण्याचा कोर्स सुरू झाला आहे. पहिल्या बॅचला ३० विद्यार्थी येथे शिक्षण घेत आहेत. हीसुद्धा एक जमेची बाजू आहे.

आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर आता जिल्ह्यात राजकीय हालचाली सुरू आहेत. या सर्व राजकारणात मीही सक्रिय असणार आहे. आमदार सतेज पाटील यासंदर्भात योग्य तो निर्णय लवकरच घेतील. त्या निर्णयानुसार आम्ही सारे जण निश्‍चितपणे या राजकारणात सक्रिय असणार, असेही ऋतुराज पाटील यांनी या वेळी स्पष्ट केले. 

कृषी महाविद्यालय सक्षम करण्‍यावर भर
कृषी विद्यापीठात शिक्षण घेऊन पुढे एमपीएससी, यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण होऊन अधिकारी बनलेल्यांची संख्या अधिक आहे, हे माझ्या लक्षात आल्यानंतर कृषी महाविद्यालय सक्षम करण्याच्या दृष्टीनेही माझे प्रयत्न सुरू आहेत. त्यावर भर राहिला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com