
“Sangli ranks in Maharashtra’s top 10 districts for Ayushman Bharat card distribution; efforts on to increase coverage.”
Sakal
सांगली: शासनाच्या महत्त्वाकांक्षी एकत्रित आयुष्यमान भारत जनआरोग्य योजनेअंतर्गत जिल्ह्यात आतापर्यंत अकरा लाख ३२ हजार नागरिकांना आयुष्यमान कार्ड देण्यात आले आहे. ही संख्या एकूण लाभार्थींच्या ४१ टक्के आहे. कार्ड वितरणात जिल्हा राज्यात पहिल्या दहामध्ये आहे. ही संख्या वाढवण्यासाठी आरोग्य विभागाचे युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत. त्यासाठी सध्या सुरू असलेल्या ‘स्वस्थ नारी-सशक्त परिवार’ अभियानातही हे कार्ड काढण्यात येत आहे.