Sangram Jagtap statement on Kesarekar murder
esakal
सांगली : ‘‘देश संविधानाने चालतोय. त्यामुळे हिंदू समाजाचा अंत पाहू नका; अन्यथा देशात राज्यात राहू देणार नाही,’’ असा इशारा देत पीडित कुटुंबाच्या मागे प्रत्येक हिंदूने खंबीरपणे उभे राहण्याची आवश्यकता आहे, असे आवाहन आमदार संग्राम जगताप यांनी (Kesarekar Couple Murder Case) केले. कुपवाडमधील मोहन आणि मनीषा केसरेकर या दाम्पत्याचा फरीद शेख या नराधमाने निर्घृण खून केल्याचा निषेधार्थ सांगलीत सकल हिंदू समाजाच्यावतीने बंद पाळून मोर्चा काढण्यात आला.