Jayant Patil : सांगली लोकसभा मतदारसंघातील उमेदवारी वाटपाशी आपला काहीही संबंध नाही

सांगली लोकसभा मतदारसंघातील उमेदवारी वाटपाशी आपला काहीही संबंध नाही. माझ्याबद्दल विनाकारण अपप्रचार केला जात आहे.
Jayant Patil
Jayant Patilsakal

इस्लामपूर (जिल्हा सांगली) - सांगली लोकसभा मतदारसंघातील उमेदवारी वाटपाशी आपला काहीही संबंध नाही. माझ्याबद्दल विनाकारण अपप्रचार केला जात आहे. जिल्ह्यात काहीही झाले तरी त्याच्याशी माझा संबंध जोडणे योग्य नाही.

आपल्या पक्षाने १३ जागांची मागणी केली होती; मात्र आपणास १० जागा मिळाल्या. ३ जागा सोडव्या लागल्या. जागावाटपात जे झाले ते झाले, सर्वांनी आघाडीधर्म पाळायला हवा, असे मत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष, माजी मंत्री आमदार जयंत पाटील यांनी आज येथे व्यक्त केले.

हातकणंगले लोकसभा मतदार संघातील महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार सत्यजित पाटील सरूडकर यांच्या प्रचारार्थ इस्लामपूर विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात ते बोलत होते. उमेदवार सत्यजित पाटील सरूडकर, श्रीमती सरोज पाटील, राज्य बँकेचे माजी अध्यक्ष माणिकराव पाटील, शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे संपर्कप्रमुख प्रा. नितीन बानूगडे- पाटील, जिल्हाध्यक्ष अभिजित पाटील, प्रतीक पाटील, युवक राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष विराज नाईक प्रमुख उपस्थित होते.

जयंत पाटील म्हणाले, 'आपण गांभीर्याने घेतले नाही तर ही लोकसभेची शेवटची निवडणूक ठरेल, याचे भान ठेवून कामाला लागा. भाजपाने गेल्या दहा वर्षात देशावर २०५ लाख कोटी रुपयांचे कर्ज करून ठेवले आहे. हे कर्ज फेडण्यासाठी ते निवडणुका झाल्यावर १८ टक्के जीएसटी आणि इतर कर वाढवू शकतात. सत्यजित पाटील यांना दहा वर्षाच्या अनुभव आहे.

ते केंद्र सरकारकडून अनेक विकास कामांना नक्की गती देऊ शकतात.' सत्यजित पाटील म्हणाले, 'भाजपाने गेल्या १० वर्षात केवळ घोषणा आणि जाहिराती केल्या. सामान्य माणसाच्या हातात काहीही पडलेले नाही. मी १० वर्षे आमदार म्हणून काम केलेले आहे. आपणा सर्वांना बरोबर घेऊन मतदारसंघाच्या विकासाला चालना देईन. मी पक्ष,नेतृत्व आणि सामान्य जनतेशी १०० टक्के ईमान राखेन.'

प्रा. नितीन बानूगडे-पाटील म्हणाले, 'भाजपाने शिक्षणाची वाट लावली असून देशातील ४६ कोटी युवकांचे भवितव्य अंधारात आहे. देशातील बुद्धीवान युवक, श्रीमंत लोक देश सोडत आहेत. भाजपच्या काळात देश महासत्ता बनू शकत नाही. देशाच्या दुसऱ्या स्वातंत्र्यासाठी, महाराष्ट्र धर्मासाठी आपणास लढावे लागेल. सर्वसामान्य माणसाचे डोळे उघडले असून भाजपाचा पराभव अटळ आहे.'

अभिजित पाटील, प्रतीक पाटील, श्रीमती सरोज पाटील, माजी नगराध्यक्ष अँड. चिमण डांगे, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष विजयराव पाटील, वैभव शिंदे, महिला राष्ट्रवादीच्या जिल्हाध्यक्षा सुस्मिता जाधव, खंडेराव जाधव, शिवसेनेचे शकील सय्यद, यांची भाषणे झाली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com