'शरद पवार, उध्दव ठाकरे यांच्या सल्ल्यानेच कर्जमाफी' 

subhash-deshmukh
subhash-deshmukh

सांगली - शेतकरी कर्जमाफी जाहीर करण्यापूर्वी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जेष्ठ नेते शरद पवार, शिवसेचे कार्याध्यक्ष उध्दव ठाकरे यांच्याशी सल्लामसलत केली होती, मात्र तरीही होणारी आंदोलने दुर्दैवी असल्याची खंत सहकार तथा पालकमंत्री सुभाष देशमुख यांनी आज येथे व्यक्त केले. "कर्जमाफीचे चर्वण' या विषयावरुन मंत्री श्री. देशमुख, खासदार संजय पाटील, जिल्हा बॅंक अध्यक्ष दिलीप पाटील यांच्यात चांगलीच राजकीय कुरघोडी पहायला मिळाली. 

सांगली जिल्हा बॅंकेत "विकास सोयायट्या सक्षमीकरण' विषयावर कार्यशाळा झाली. त्यावेळी कार्यक्रमांत सहकार मंत्री देशमुख, खासदार संजय पाटील, जिल्हा बॅंक अध्यक्ष दिलीप पाटील यांच्यात कर्जमाफीच्या चर्वणावरुन राजकीय कुरघोडी पहायला मिळाली. 

मंत्री देशमुख म्हणाले,"" कर्जमाफी जाहीर करताना दोन्ही बाजू, चांगल्या वाईट गोष्टी विचारात घेतल्या. कर्जमाफीत गरीब-श्रीमंत दरी दुर करण्याचा प्रयत्न केला. सन 2008 मधील कर्जमाफीत शेतकऱ्यांना 25 लाखाची कर्जमाफी झाली. छोट्या अल्पभूधारक शेतकऱ्यांना लाख, दीड लाखापर्यंतचे कर्ज पुरेसे असते. कर्जमाफी जाहिर करण्यापूर्वीही जेष्ठ नेते शरद पवार, शिवसेनेचे उध्दव ठाकरे यांच्याशी चर्चा केली. मात्र कर्जमाफी जाहीर केल्यानंतर विरोधकांकडून विविध विधाने आणि आंदोलन सुरु झालीत.'' जिल्हा बॅंक अध्यक्ष श्री. पाटील यांच्या कर्जमाफी चर्वनावरुन ते म्हणाले,"" शेतकरी अन्न खाताना चांगले म्हणजे एका घासाचे 32 वेळा चर्वन करतो म्हणून चांगले पचते, अर्थवट चर्वनाने काय होते. हे 2008 च्या कर्जमाफीत पाहिले. आता काही बॅंकांना त्यांच्या उलट्या सुरु झाल्या आहेत. कर्जमाफीतील अटीतील पारदर्शकेचे महत्व भविष्यात पटेल. आजच्या कार्यशाळेतही अनेकांनी त्याच भावना व्यक्त केल्या. त्या विरोधातील आंदोलन, ओरड चुकीचीच आहे.'' 

जिल्हा बॅंक अध्यक्ष श्री. पाटील म्हणाले,"" सहकार मंत्री म्हणून देशमुख यांचा चांगला अभ्यास आहे. त्याच्यामुळे आज अनेक निर्णय चांगले घेतले आहेत. शासनाच्या कर्जमाफीचे चर्वनाने मात्र शेतकरी सरकारवर राजी होण्याऐवजी नाराजी वाढली आहे. झटपट निर्णयाची गरज होती. सरकार राष्ट्रीयकृत बॅंकांना 2 लाख कोटी देणार असेल तर सहकारी बॅंकांनाही मदतीची गरज आहे.'' 

खासदार संजय पाटील म्हणाले,"" राज्य शासनाचा कर्जमाफीचा निर्णय अतिशय विचार करुन घेतला. अटीमुळे अपात्र लोक बाजूला तर पात्र शेतकऱ्यांनाच फायदा होईल. जिल्हा बॅंक अध्यक्ष पाटील मात्र ते मान्य करायला तयार नाहीत. कर्जमाफीचा निर्णयाचे गोलमाल अध्यक्ष श्री. पाटील करीत आहेत. सहकार मंत्र्यांचे कौतुक करताना तुम्ही अप्रत्यक्ष भाजप सरकारवर निशाणा हे धोरण चुकीचे वाटते. सगळ मानाने ते तुम्ही मान्यच करीत नाही.''

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com