सांगली : टेंभूचे पाणी न सोडल्यास पंप बंद करण्याचा इशारा

अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे टँकरद्वारे पाणी देण्याची स्थिती निर्माण होणार
 टेंभूच्या सुर्ली कालव्याचे पाणी कडेगांव तालुक्यातील नेर्ली
टेंभूच्या सुर्ली कालव्याचे पाणी कडेगांव तालुक्यातील नेर्लीsakla

वांगी : टेंभूच्या सुर्ली कालव्याचे पाणी कडेगांव तालुक्यातील नेर्ली, अपशिंगे, कोतवडे, खंबाळे या गावांना न सोडल्यास टप्पा १ वर आंदोलन करून पंप बंद करण्याचा इशारा ग्रामस्थांनी अधिकाऱ्यांना दिला आहे. निवेदनात म्हटले आहे, की टेंभूचे पाणी नेर्ली, खंबाळे, अपशिंगे व कोतवडेतून जाते. पाण्याचे आवर्तन २१ फेब्रुवारीला भागासाठी बंद झाले. नियमाप्रमाणे आवर्तन सुरू होणे आवश्यक होते. आजअखेर विनंती करूनसुद्धा दखल घेतली नाही. ऊसासह पिके वाळून गेलीत. पिण्याच्या पाण्याचा प्रश्न बिकट झाला. अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे टँकरद्वारे पाणी देण्याची स्थिती निर्माण होणार आहे.

रविवारी (ता. १७) पर्यंत पाणी सुरू झाले नाही तर सोमवारी (ता. १८) टेंभूच्या येथील कार्यालयावर जाऊन आंदोलन करणार, पंपहाऊसचे टाळे तोडून पंप बंद करणार आहोत. अधिकाऱ्यांनी योग्य कार्यवाही करावी.

दत्तात्रय क्षीरसागर, शिवाजी पवार, राजाराम शिंदे, माजी सरपंच सुनिल पाटील, अशोक गायकवाड, चंद्रकांत पाटील, जगन्नाथ जंगम, गणेश पाटील, अजित मुळीक यांच्यासह शेतकऱ्यांच्या सह्या आहेत. मंत्री डॉ. विश्वजित कदम, तहसीलदार, उपविभागीय अधिकारी, पोलिस उपनिरक्षक यांना माहितीसाठी निवेदन देण्यात आले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com