हे म्हणजे असं झालं...चार आण्याची काेंबडी अन् बारा आण्याचा मसाला

हे म्हणजे असं झालं...चार आण्याची काेंबडी अन् बारा आण्याचा मसाला

सातारा : मटण आणि चिकन विक्रीची परवानगी देताना जिल्हाधिकाऱ्यांनी घरपोच सुविधेची अट ठेवली आहे. या अटीऐवजी सोशल डिस्टन्सिंगचे पालन करत विक्रीला परवानगी देण्याचा सहानुभूतीपूर्वक विचार करण्याबरोबर बोकड वाहतुकीसाठी परवानगी देण्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी निर्णय घ्यावा, अशी मागणी खाटीक संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे. 

केंद्र शासनाच्या अत्यावश्‍यक वस्तूंच्या यादीमध्ये मटण व चिकन विक्रीला परवानगी देण्यात आलेली आहे. त्याचबरोबरच उपमुख्यमंत्र्यांनीही राज्यात याला परवानगी असल्याचे सूचीत केले होते. परंतु, जिल्ह्यामध्ये मटणविक्रीला परवानगी देण्यात आलेली नव्हती. याबाबत आवश्‍यक त्या नियम व अटी घालून मटण व चिकनविक्रीला परवानगी देणे गरजेचे असल्याचे तसेच बंदी असल्यामुळे विक्रेत्यांबरोबर बोकड आणि कोंबड्यांच्या निर्मितीमध्ये असलेल्या शेतकरी व त्यांच्या मुलांचे नुकसान होत असल्याबाबतचे वृत्त "सकाळ'ने प्रसिद्ध केले होते. त्यानंतर हिंदू-मुस्लिम खाटीक समाजाच्या वतीने याबाबत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. त्यामध्ये त्यांनी नियम व अटींचे पालन करण्याच्या जबाबदारीवर परवानगी देण्याची मागणी केली. या दोन्ही बाबींचा विचार करून जिल्हाधिकाऱ्यांनी काल मटण व चिकन विक्रीला परवानगी देण्याचा निर्णय घेतला. परंतु, त्यामध्ये घरपोच सेवा देण्याची अट घातली आहे. त्यामुळे विक्रेत्यांमध्ये थोडी चलबिचल झाली आहे. कोणाकडेच अद्याप घरपोच सेवेसाठी कामगार नाहीत. सध्या तातडीने ती व्यवस्था उभारण्यात अडचणी येऊ शकतात. त्यामुळे सोशल डिस्टन्सिंग पाळण्याच्या अटीवर दुकानातून विक्री करण्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी सहानुभूतीने विचार करावा, अशी मागणी संघटनेचे अध्यक्ष माणिक इंगवले यांनी केली आहे.
 
जिल्हाधिकाऱ्यांनी मटण व चिकन विक्रीबाबत घेतलेल्या निर्णयाचे स्वागतच आहे. त्यातही सामाजिक अंतर ठेवून दुकानातच विक्रीची सवलत दिली असती तर आणखी बरे झाले असते. त्याचा विचार झाला तर, आनंदच वाटेल. त्याचबरोबर मटणविक्री करण्यासाठी शेतकऱ्यांकडून बोकड आणणे आवश्‍यक आहे. त्याच्या वाहतुकीसाठी परवाना देण्याबाबत प्रशासनाने तातडीने निर्णय घ्यावा, त्यामुळे नागरिकांना सेवा देणे शक्‍य होईल, असे मत संघटनेचे उपाध्यक्ष फिरोज कुरेशी यांनी "सकाळ'कडे मांडले. मटण विक्रेत्यांच्या या प्रश्‍नाबाबत प्रशासनाकडून निर्णय अपेक्षित आहे. 

आता एक दिवसाआड पाणी मिळणार 

घरपोच सेवेमध्ये अडचणी
 
नागरिकांची आवश्‍यकता ही 250 ग्रॅमपासून सुरू होते. त्यामुळे किती रुपयांसाठी वाहतुकीचा खर्च किती करावयाचा, असाही प्रश्‍न आहे. मटणविक्रीचा धंदा हा विश्‍वासावर असतो. अनेकजण समोर बघून आवडीनुसार भाग कापून घेत असतात. घरपोच सेवेमध्ये त्यात अडचणी निर्माण होऊ शकतात.


दरम्यान सातारा जिल्हा प्रशासनाने अत्यावश्यक सेवांसह अन्य सेवा उद्यापासून (बुधवार ता. 22) सकाळी ऩऊ ते दुपारी दाेन यावेळेतच सुरु ठेवण्याचे आदेश काढले आहेत. नव्याने आदेशाप्रमाणे आत्तापर्यंत सायंकाळी सात ते नऊ यावेळेची सवलत रद्द झाली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com