सतीश जारकीहोळी
सतीश जारकीहोळीsakal

देश वाचविण्यासाठी महापुरुषांच्या विचारांची गरज सतीश जारकीहोळी

मानव बंधुत्व वेदिकेच्या माध्यमातून महापुरुषांच्या विचारांचा जागर कार्यक्रम निरंतर पणे सुरू आहे.

निपाणी : मानव बंधुत्व वेदिकेच्या माध्यमातून महापुरुषांच्या विचारांचा जागर कार्यक्रम निरंतर पणे सुरू आहे. आपण सर्वजण महापुरुषांचा इतिहास विसरत चाललो आहोत. आपल्या मेंदूला बेडीतून बाहेर काढण्यासाठी संघर्ष करावा लागेल. देश वाचविण्यासाठी महापुरुषांचे विचार घराघरात पोहोचवण्याची गरज आहे, असे मत मानव बंधुत्व वेदिकेचे संस्थापक, माजी मंत्री व कर्नाटक प्रदेश काँग्रेसचे कार्याध्यक्ष सतीश जारकीहोळी यांनी व्यक्त केले. मानव बंधुत्व वेदिकेच्या वतीने महापुरुषांच्या विचारांचा जागर उपक्रमाला निपाणी येथून सुरुवात झाली. त्याप्रसंगी ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते.

जारकीहोळी म्हणाले, एकाच सभेमुळे परिवर्तन होणे अशक्य आहे. त्यासाठी निपाणीपासून चामराजनगरपर्यंत असे कार्यक्रम होणार आहेत. त्यासाठी नागरिकांचे सहकार्य महत्त्वाचे आहे. महापुरुषांचे विचार घरोघरी पोहोचवण्याचा प्रयत्न सुरू आहे. सध्याच्या काळात आपले हक्क हिरावले जात आहेत. त्यामुळे आपले कुटुंब व परिसर बदलण्याचा प्रयत्न केला पाहिजे. जुन्या व्यवस्थेसह अंधश्रद्धा आणि बुवाबाजीमधून सर्वांनी बाहेर पडून क्रांती घडवावी.

प्रारंभी प्रा. ए. बी. रामचंद्रनावर यांनी प्रास्ताविक केले. त्यानंतर भारतीय संविधान वाचन करून कार्यक्रमाचे उद्घाटन झाले. बसवचेतन देवरु म्हणाले, प्रत्येक निवडणुकीमध्ये जाती-धर्म आणि महापुरुषांचा उल्लेख करून त्यांचा वापर केला जात आहे. मात्र सतीश जारकीहोळी यांनी वैचारिक विचार घेऊन देशाला वाचविण्याचे काम सुरू केले आहे. प्रत्येकाने महापुरुषांचे स्मरण ठेवून काम केले पाहिजे. भारतीय संविधानात बदलणाऱ्यांना आता नागरिकांनीच बदलण्याची वेळ आली आहे. दलित मुख्यमंत्री झाल्यास देश वाचणार आहे.

वैशाली डोळस यांनी, मानव बंधूत्व वेदिकेमुळे देशात क्रांती होईल. बुवाबाजी बाजूला सोडून विज्ञाननिष्ठ बनले पाहिजे. देशात दररोज शेकडो महिलांचे शोषण होत आहे. अशा परिस्थितीत देश पुन्हा पारतंत्र्यांमध्ये जाईल. समाजाचे आर्थिक शोषण होत असून त्याला आता थांबविण्याची गरज आहे. अंबानी, आदानी यांना सरकार मोठे करत असून दलितांना बाजूला ठेवले जात असून ही व्यवस्था बदलली पाहिजे. महागाई वाढली असून मोठमोठे उद्योगधंदे गुजरातमध्ये वळवून कर्नाटकातील नागरिकांना भिकेला लावले जात आहे. सध्या वापरा आणि फेकून द्या, अशीच परिस्थिती सरकारने केली आहे. प्रधानमंत्री पद संविधानामुळे मिळाले असून ते प्रत्येकांनी लक्षात ठेवून संविधानाचे अस्तित्व टिकवावे.

म्हैसूर येथील प्रकाश स्वामी यांनी, हिंदुत्व हाच मतांचा अजेंडा बनला आहे. पण सध्या त्यामध्ये बंधुत्व हवे आहे. हिंदुत्व देश नाश करत असून परिणामी देश अडचणीत आला आहे. त्यामुळे महापुरुषांच्या नावे मते मागणाऱ्यांना आपली मते विकू नका. मतदारामुळेच समाज व्यवस्था बदलू शकते. त्यामुळे महापुरुषांचा आदर्श प्रत्येकाने घेऊन जीवनात वाटचाल करण्याचे आवाहन त्यांनी केले.

कार्यक्रमास माजी आमदार काकासाहेब पाटील, माजी मंत्री वीरकुमार पाटील, चिक्कोडी जिल्हा काँग्रेस अध्यक्ष लक्ष्मण चिंगळे, युवा नेते उत्तम पाटील, निपाणी ब्लॉक काँग्रेस अध्यक्ष राजेश कदम, माजी जिल्हा पंचायत उपाध्यक्ष पंकज पाटील, युवा नेते रोहन साळवे, दलित क्रांतिसेनेचे अध्यक्ष अशोककुमार असोदे, माजी जि. पं. सदस्य राजेंद्र वड्डर, बेडकीहाळ ब्लॉक काँग्रेस अध्यक्ष बसवराज पाटील, युवा नेते राहुल जारकीहोळी, महावीर मोहिते, विजय शेटके, माजी जिल्हा पंचायत सदस्य अण्णासाहेब हावले, सुप्रिया पाटील, शैलजा चडचाळे, साधना माळगे, नगरसेवक विलास गाडीवड्डर, बाळासाहेब देसाई-सरकार, संजय सांगावकर, युवराज पोळ, नवनाथ चव्हाण, अल्लाबक्ष बागवान, सुनील हणमणावर, दिग्विजय-पवार देसाई, सुजय पाटील, महादेव कौलापुरे, प्रतीक शहा, सुंदर पाटील, दिलीप पठाडे, बाबुराव खोत, अशोक लाखे, गजानन मंगसुळी यांच्यासह चिक्कोडी जिल्हा काँग्रेस व्याप्तीतील मतदारसंघातील आजी-माजी नगरसेवक पदाधिकारी, महिला उपस्थित होत्या.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com