बेळगाव : शाळा सोडणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मोहीम

राज्य सरकारचा विचार रात्रशाळेसह अन्य उपाययोजना करणार
school
schoolsakal

बेळगाव : शाळा सोडणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या वाढत असल्याने त्यांना पुन्हा मुख्य प्रवाहात आणून शिक्षित करण्यासाठी विशेष मोहीम हाती घेण्याचा विचार सरकारने सुरू केला आहे. याबाबत लवकरच निर्णय घेतला जाणार आहे. कोरोनामुळे निर्माण झालेल्या विविध प्रकारच्या संकटांमुळे अनेक विद्यार्थी शिक्षणापासून दूर गेले आहेत. त्यांना पुन्हा मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शिक्षण खात्यातर्फे वेगवेगळे उपक्रम हाती घेतले जात आहेत, तरीही अनेक विद्यार्थी शिक्षणापासून दूर असल्याचे स्पष्ट झाले आहे.

त्यामुळे शिक्षण अर्धवट सोडलेल्या विद्यार्थ्यांची माहिती संकलित करण्याचे काम हाती घेऊन त्यांच्यासाठी गावात रात्रशाळा किंवा इतर उपाययोजना करून शिकविण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. काही वर्षांपू्वी देशात साक्षर भारत योजना हाती घेण्यात आली होती. त्यावेळी अशिक्षित लोकांची माहिती संकलित करून त्यांच्यासाठी रात्रशाळा सुरू करण्यात आल्या होत्या. त्याचप्रमाणे अर्धवट शिक्षण सोडलेल्या विद्यार्थ्यांसाठीही उपायोजना करून त्यांना मुख्य प्रवाहात आणण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.

शाळाबाह्य विद्यार्थ्यांच्या सर्वेक्षणाचे काम हाती घेतले जाते. त्यानंतर शाळेपासून दूर असलेल्या विद्यार्थ्यांना पुन्हा शाळेत परत आणले जाते. मात्र, शिक्षण अर्धवट सोडलेले विद्यार्थी विविध कामात गुंततात. अशा विद्यार्थ्यांना शोधून त्यांना पुन्हा शिकवण्याचा प्रयत्न करण्यासाठी शिक्षण खात्याला चांगलीच कसरत करावी लागणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com