एकाच शाळेत शिकण्याचे आता ‘आरटीई’त बंधन

RTE
RTE

सातारा - शिक्षण हक्क कायद्यानुसार (आरटीई) जो विद्यार्थी इयत्ता पहिलीत ज्या शाळेत प्रवेश घेईल त्याला त्याच शाळेत इयत्ता आठवीपर्यंत शिक्षण घेणे बंधनकारक करण्यात आले आहे. त्याला मधून शाळा बदलता येणार नाही. बदलल्यास त्याला योजनेचा लाभ मिळणार नाही. 

शिक्षण हक्क कायद्यानुसार (आरटीई) वंचित व दुर्बल घटकांतील मुलांना खासगी विनाअनुदानित शाळांमध्ये प्रवेश देण्याची प्रक्रिया २५ फेब्रुवारीपासून सुरू होणार असून, ती ११ मार्चपर्यंत चालणार आहे. त्यासाठी पालकांनी https://student.maharashtra.gov.in/adm_portal/Users/rteindex या संकेतस्थळावर ऑनलाइन पद्धतीने अर्ज भरणे अपेक्षित आहे. अर्ज भरण्याची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर पहिली प्रवेशाची सोडत १४ मार्चला होईल. 

प्रवेश प्रक्रियेतील शाळांच्या नोंदणी व पडताळणीस प्रारंभ झालेला आहे. शाळांनी सरल पोर्टलवर नोंदणी केलेल्या एकूण प्रवेश निश्‍चिती संख्येच्या २५ टक्के गटशिक्षणाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली समिती विशेषतः कागदपत्रांमध्ये त्रुटी काढून विद्यार्थ्यांना प्रवेश नाकारला जात असल्याच्या तक्रारींचे प्रमाण अधिक आहे. यामुळे शिक्षण संचालनालयाने शाळा स्तरावरील कागदपत्रांची तपासणी करण्याचा निर्णय रद्द केला. आता गटशिक्षणाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमली जाणार आणि ही समिती कागदपत्रांची पडताळणी करणार आहे. त्यामुळे पालकांना दिलासा मिळाला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com