

शक्तीपीठ महामार्गावरून वाळव्यात 'रणकंदन'! सुपीक जमिनी आणि पूरस्थितीच्या भीतीने शेतकरी आक्रमक; २५ तारखेला ईश्वरपुरात महामेळावा
sakal
ईश्वरपूर (जिल्हा सांगली) : संभाव्य शक्तीपीठ महामार्ग विरोधी शेतकरी एकवटताना दिसत आहेत. या महामार्गाच्या विरोधात भूमिका निश्चित करण्यासाठी वाळवा तालुक्यातील शेतकरी शनिवार (ता. २५) सकाळी ११ वाजता राजारामबापू नाट्यगृह येथे एकत्र येणार आहेत. शक्तीपीठ महामार्ग विरोधी संघर्ष समितीने या मेळाव्याचे आयोजन केले आहे.