किरकोळ आजारांनी काढले डोके वर!

Sickness
Sickness

सातारा - पावसाळा सुरू होताच किरकोळ आजारांनी डोके वर काढले आहे. खासगीसह शासकीय रुग्णालयांच्या ‘ओपीडी’त लहान मुलांसह आबालवृद्धांची गर्दी वाढली आहे. पावसाळ्याच्या पार्श्‍वभूमीवर नागरिकांनी दक्षता घेणे गरजेचे आहे. 

पावसाळ्यात नेहमीच रोगराईला पोषक वातावरण असते. सर्व प्रकारच्या आजारी माणसांना पावसाळी हवामान बाधते. विशेषतः आजारांची साथ ही दूषित पाण्यामुळे, डासांमुळे उद्‌भविते. त्यामुळे साथीचा उद्‌भव रोखण्यासाठी नागरिकांनी पिण्यासाठी शुद्ध पाण्याचा वापर करावा, उघड्यावरील अन्न पदार्थ टाळावेत, तसेच परिसर स्वच्छतेची खबरदारी घेणे आवश्‍यक आहे.

याबाबत बालरोगतज्ज्ञ डॉ. अच्युत गोडबोले म्हणाले, ‘‘पावसाळ्यात उद्‌भविणारे आजार रोखण्यासाठी पाणी उकळून व गाळून प्यावे, लहान मुलांना शक्‍यतो पावसात भिजू देऊ नये. भिजल्यास डोके, अंग कोरडे करावे, उघड्यावरील अन्न पदार्थ खाऊ नयेत, तेलकट पदार्थ टाळावेत, अन्न गरम करून खावे, शिळे अन्न खाणे टाळावे. लहान मुलांबरोबरच ज्येष्ठ नागरिकांनी उबदार कपडे घालून बाहेर पडावे.’’

दरम्यान, गेले आठ दिवस जिल्ह्यात सातत्याने पाऊस पडत आहे. हवामान दमट आहे. हे वातावरण रोगराईसह जतूंच्या निर्मितीस पोषक ठरत आहे. शहरासह ग्रामीण भागात डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे. एकूणच या वातावरणामुळे सर्दी, पडसे, डोकेदुखी, अंगदुखी अशा किरकोळ आजारांच्या रुग्णांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे. प्राथमिक आरोग्य केंद्र, जिल्हा शासकीय रुग्णालय आणि खासगी दवाखान्यात ही गर्दी जाणवत आहे. 

...अशी घ्या काळजी 
गढूळ पाणी उकळून व गाळून प्यावे
आठवड्यातून एक कोरडा दिवस पाळावा 
कोरड्या दिवशी सर्व पाणीसाठे (उदा. रांजण, कोथळी, माठ, गावातील पाण्याची डबकी) नष्ट करावेत 
नारळाच्या रिकाम्या करवंट्या, ट्यूब, टायर जाळून टाकावेत 
डास उत्पत्तीच्या स्थाने नष्ट करावीत 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com