शिवस्मारकासाठी सांगली जिल्ह्यातून माती, पाणी - पृथ्वीराज देशमुख

शिवस्मारकासाठी सांगली जिल्ह्यातून माती, पाणी - पृथ्वीराज देशमुख

सांगली - मुंबईत अरबी समुद्रात होणाऱ्या शिवस्मारकासाठी जिल्ह्यातून माती, पाणी पाठवले जाणार आहे. शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या जिल्ह्यातील विविध ठिकाणांतून माती व पाणी उद्या (ता. २२) शहरात आणली जाणार आहे. भाजपचे जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख, शहराध्यक्ष आमदार सुधीर गाडगीळ यांनी आज पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.

ते म्हणाले, ‘‘शिवस्मारकाचे भूमिपूजन येत्या २४ ला मुंबईत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत होणार आहे. त्यासाठी राज्याच्या ज्या भागात शिवरायांचे सानिध्य लाभले तेथून माती व पाणी नेले जाणार आहे. जिल्ह्यात बाणूरगड, जुन्हा पन्हाळा आदी ठिकाणांहून पाणी आणले जाणार आहे. दुपारी १ वाजता जलकलशांचे आगमन मारुती चौकात शिवराजांच्या पुतळ्याजवळ होईल. तेथून मिरवणुकीने ते सायंकाळी ५ वाजता टिळक स्मारक मंदिरात नेले जाईल. तेथे खासदार संजय पाटील, आमदार शिवाजीराव नाईक, सुधीर गाडगीळ, सुरेश खाडे, विलासराव जगताप यांच्या उपस्थितीत सभा होईल.’’ 

या कार्यक्रमाच्या तयारीसाठी आज येथे बैठक झाली. आमदार गाडगीळ यांच्या संपर्क कार्यालयात जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. पश्‍चिम महाराष्ट्र संपर्क विभागाचे मकरंद देशपांडे, माजी जिल्हाध्यक्ष राजाराम गरुड, तालुकाप्रमुख आदी उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com