

BJP leaders Padalkar and Chakurkar take charge in Solapur as part of early preparations for the 2029 Lok Sabha elections
sakal
सोलापूर : लोकसभा निवडणुकीला आणखी तीन वर्षांचा अवकाश असला तरी भाजपने ती जिंकण्यासाठी विविध कार्यक्रमांद्वारे मोर्चेबांधणी सुरू केली आहे. सध्या सुरू असलेल्या प्रशिक्षण वर्गांसह लवकरच होणाऱ्या ‘एसआयआर’ अभियान, डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती आणि २६ एप्रिलच्या ‘मन की बात’ कार्यक्रमासाठी पक्षाने प्रभारी नेमले आहेत. सोलापूर शहराची जबाबदारी डॉ. अर्चना पाटील-चाकूरकर यांच्याकडे, तर ग्रामीण भागाची जबाबदारी आमदार गोपीचंद पडळकर यांच्याकडे सोपवली आहे.