स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीचा निर्णय हा जनतेला विचारूनच - भगीरथ भालके

एका स्थानिक कार्यक्रमाचे निमित्ताने मंगळवेढ्यात आले असता त्यावेळी भगीरथ भालके सकाळशी बोलत होते.
Bhagirath Bhalake
Bhagirath BhalakeSakal
Summary

एका स्थानिक कार्यक्रमाचे निमित्ताने मंगळवेढ्यात आले असता त्यावेळी भगीरथ भालके सकाळशी बोलत होते.

मंगळवेढा - आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका या कशा पद्धतीने याबाबतचा निर्णय हा जनतेला विचारूनच घेणार असल्याची भूमिका राष्ट्रवादीचे नेते भगीरथ भालके यांनी मांडली.

एका स्थानिक कार्यक्रमाचे निमित्ताने मंगळवेढ्यात आले असता त्यावेळी ते सकाळशी बोलत होते. ते म्हणाले, की सलग तीन वेळा वेगवेगळ्या पक्षातून आमदार करण्याची संधी स्व. भारत नाना जनतेनी दिली. त्यावेळी स्व. भारत नाना हे विधानसभा निवडणुकीला सामोरे जाण्यापूर्वीचा निर्णय हा जनतेला विचारूनच घेत होते. त्यामुळे निवडणुकीबाबतचा निर्णय हा जन्मनाथाचा आदर करूनच घेताना समविचारी बरोबर लढवायच्या की पक्षाच्या चिन्हावर लढवायचा हा निर्णय तालुक्यातील ग्रामीण भागात स्व. भारत नानाला माणणाऱ्या सर्व कार्यकर्त्याला बोलावून घेणार आहे. मंगळवेढा उपसा सिंचन योजनेच्या संदर्भात बोलताना ते म्हणाले की, 2014 साली तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी या योजनेला प्रशासकीय मान्यता दिली. परंतु, राज्यात सत्तांतर झाल्यामुळे या योजनेतील पाणी आणि गावे कमी केले होते. त्यासाठी स्वर्गीय नानांनी स्व. पाणी संघर्ष समितीचे प्रमुख स्व. जयसिंग निकम यांच्या नेतृत्वाखाली तालुक्यातील पांडुरंग चौगुले, स्व. हर्षराज बिले, स्व. बाबासाहेब बेलदार, तानाजी काकडे, बसवराज पाटील, गुलाब थोरबोले, अशोक जाधव, दिनेश पाटील, सुरेश कोळेकर, ईश्वर येजगर, धनाजी बिचुकले, शिवाजी सावंत, यासह अनेक गावाच्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून उच्च न्यायालयात याचिका दाखल केली.

शेवटी सरकारला पाणी देण्याबाबतची शपथपत्र द्यावे लागले पाणी आणि गावे कमी करून दाखल केलेला प्रस्ताव परत आला. त्यानंतर राज्यात 2019 च्या विधानसभा निवडणुकीनंतर सत्तेत आलेल्या महाविकास आघाडी सरकारमध्ये तत्कालीन जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्या माध्यमातून पाणी आणि गावे पूर्ववत करण्यात स्व. भारत नानांनी यश मिळवले. व या योजनेचे अंदाजपत्रक पुन्हा नव्याने करण्यात आले. आणि नवे अंदाजपत्रक करत असताना धावपळीत स्व. नानाचे अकाली निधन झाले. त्यानंतर देखील या पाण्यासाठी मी स्व. नानांनी सांगितल्याप्रमाणे पाठपुरावा केला. जिथे जिथे अडचण येईल तिथे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्या कानावर घालत हा प्रस्ताव शेवटी मुख्यमंत्र्याच्या सहीला नेऊन ठेवला. तोच पुन्हा राज्यात सत्ता बदल झाल्याने त्या प्रस्ताव अजून तसाच आहे. तालुक्यातील प्रश्नासाठी मी जनतेच्या संपर्कात असून माझा प्रयत्न सुरूच आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com