Ashadhi Wari 2025: 'माउलींच्या सोहळ्यात सहकुटुंब अन्नदान करणारा अवलिया'; भारत रामीनवार यांच्याकडून दहा वर्षांपासून सेवा

भव्य लॉजिंग आहे. मात्र, त्यांची वारकऱ्यांची सेवेची आस मात्र आजही कायम आहे. अन्नदानासाठी त्यांनी १०० बाय २०० चा भव्य वॉटरप्रूफ मंडप उभारला असून, यासाठी मंडप ठेकेदारास साडेतीन लाख रुपये दिलेले आहेत. अन्नदान २८ जूनपासून सुरू असून २८, २९ व ३० जूनच्या रात्रीपर्यंत अन्नदान चालणार आहे.
Bharat Raminwar and family selflessly serve food to Warkaris during Mauli Wari — continuing a 10-year-long tradition of annadan.
Bharat Raminwar and family selflessly serve food to Warkaris during Mauli Wari — continuing a 10-year-long tradition of annadan.Sakal
Updated on

-सुनील राऊत

नातेपुते : वारीतील वारकऱ्यांना अन्नदानाच्या रूपाने आधार देणारा अवलिया भारत विश्वनाथ रामीनवार (रा. नांदेड) यांची विलक्षण कथा आहे. इयत्ता चौथीपर्यंत शिक्षण झालेल्या भारत रामीनवार यांना संजय गांधी निराधार योजनेमधून १९८४ साली शासनाकडून २५० रुपये मिळाले होते. या अडीचशे रुपयांपासून ते आज बडे असामी झाले आहेत. मात्र, एकेकाळची आपल्या गरिबीची जाणीव असणारा हा माणूस आपल्या वडिलांची पंढरपूरची वारी डोळ्यापुढे ठेवून, वारीतील अनुभव लक्षात असल्यामुळे आपण काहीतरी केले पाहिजे, या एका ध्येयाने पछाडून त्यांनी नातेपुते जवळील शिखर शिंगणापूरच्या चौकात मोरोची हद्दीतील जालिंदर व हनुमंतराव सूळ यांच्या जागेत दहा वर्षांपासून वारकऱ्यांसाठी पिठले- भाकरी जेवण सुरू केले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com