
सोलापूर: सोलापूर जिल्ह्यातील ११ नगरपरिषदांच्या प्रारूप प्रभागरचनेवर हरकती घेण्याचा आज शेवटचा दिवस होता. आजच्या शेवटच्या दिवशी ३८ हरकती दाखल झाल्या आहेत. आतापर्यंत एकूण १७२ हरकती दाखल झाल्या आहेत. दाखल झालेल्या हरकतींवर बुधवारपासून (ता. ३) उपजिल्हाधिकारी गणेश निऱ्हाळी यांच्यासमोर सुनावणी होणार आहे. या सुनावणीनंतर २६ ते ३० सप्टेंबर दरम्यान प्रभागरचना अंतिम केली जाणार आहे.