Solapur News : 'बांध-बंधारे फुटले, फळबागा जमीनदोस्त'; वादळी वारे अन्‌ पावसाचा शेतकऱ्यांना तडाखा

Farmers Hit Hard as Rains : अनपेक्षितपणे झालेल्या या पावसामुळे बेसावध असलेल्या शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. केळी, डाळिंब, पेरू, आंबा, द्राक्ष, पपई या बागांसह कांदा पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.वीज पडून जीवितहानी झाली असून मुसळधार पावसामुळे अनेक शेतकऱ्यांचे बांध तसेच छोटे-मोठे बंधारे फुटले आहेत.
Collapsed embankments and destroyed orchards after a storm lash rural farming areas.
Collapsed embankments and destroyed orchards after a storm lash rural farming areas.Sakal
Updated on

सोलापूर : शहर-जिल्ह्यात यंदा प्रथमच मे महिन्यात मॉन्सूनपूर्व पावसाने उच्चांक मोडला आहे. आतापर्यंत सुमारे १७१ मिलिमीटर इतका पाऊस झाला आहे. जिल्ह्यातील पावसाची मे महिन्याची सरासरी ३२ मिलिमीटर इतकी आहे. आतापर्यंत जवळपास सात पट जादा पाऊस झाला आहे. अनपेक्षितपणे झालेल्या या पावसामुळे बेसावध असलेल्या शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. केळी, डाळिंब, पेरू, आंबा, द्राक्ष, पपई या बागांसह कांदा पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. तसेच वीज पडून जीवितहानी झाली असून मुसळधार पावसामुळे अनेक शेतकऱ्यांचे बांध तसेच छोटे-मोठे बंधारे फुटले आहेत.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com