Solapur :अरण्यऋषींनी निर्माण केली पर्यावरण प्रबोधनाची नवी वाट; सोलापुरातील शोकसभेत सर्वधर्मीय नागरिकांची भावना
जंगलातील कार्यकलाचे विराट दर्शन त्यांनी साहित्याच्या माध्यमातून लोकांसमोर आणले. जर काही माहिती नव्हती त्याचे त्यांनी स्वानुभवाच्या आधारे साहित्यात रूपांतर केले. या त्यांच्या कार्याने पर्यावरण क्षेत्राला नवा आयाम दिला.
All-faith community in Solapur pays tribute to Aranyrishi — a spiritual leader of the environment.Sakal
सोलापूर : अरण्यऋषी मारुती चितमपल्ली यांचे कार्य केवळ निसर्गापुरते मर्यादित नव्हते, तर संपूर्ण जंगल मानवी जीवनासमोर मांडण्याचा तो यथार्थ प्रयत्न होता. पर्यावरण प्रबोधनाची त्यांनी नवी वाट निर्माण केली, या शब्दात मान्यवरांनी त्यांना आदरांजली वाहिली.