

Solapur District Farmers to Receive ₹370 Crore Aid for Crop Losses
Sakal
सोलापूर: जिल्ह्यातील सात लाख ९८ हजार ९१० शेतकऱ्यांना सप्टेंबर महिन्यात अतिवृष्टीचा व पुराचा फटका बसला. त्यांच्यासाठी शासनाने ८६८ कोटी रुपयांची मदत दिली. त्यापैकी ३७० कोटींची भरपाई आतापर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाली आहे. चार लाख ९० हजार ९१० शेतकऱ्यांना भरपाईची प्रतीक्षा आहे. अशा शेतकऱ्यांना मदत मिळायला १५ ते २० दिवस लागतील, अशी स्थिती आहे.