
सोलापूर: काम सोडून पती गावातच हातभट्टी पिऊन पडतोय, घरी आला की सतत भांडण करतो, घरखर्चासाठी, मुलांच्या शिक्षणासाठी पैसे देत नाही, अशा त्रासाला कंटाळून गावागावांतील विवाहिता माहेरी निघून गेल्या आहेत. धक्कादायक बाब म्हणजे अनेक महिलांनी घटस्फोटासाठी देखील अर्ज केले आहेत.