

Special train flagged off for Kartiki Wari pilgrims from Adilabad to Pandharpur under Solapur division.
Sakal
सोलापूर : ‘आषाढी-कार्तिकी विसरू नका मज, सांगतसे गुज पांडुरंग’ या अभंगाप्रमाणे वारकरी संप्रदायात कार्तिकी एकादशीला आषाढी पाठोपाठ महत्त्व आहे. यासाठी कार्तिकी वारी कालावधीतील वाढती गर्दी लक्षात घेऊन रेल्वेने मिरज-लातूर पाठोपाठ आदिलाबादला शुक्रवार (ता.३१) पासून चार जादा गाड्या सोडण्यात आल्या आहेत. कार्तिकी एकादशीनिमित्त प्रवासी भाविकांची अतिरिक्त गर्दी कमी करण्यासाठी रेल्वेकडून आदिलाबाद आणि पंढरपूर दरम्यान विशेष गाड्या चालविण्यात येणार आहेत.