

Dry farmlands in South Maharashtra after water supply from Umarani barrage was reportedly halted.
Sakal
सोलापूर: उजनी धरणातून सोडलेले पाणी कर्नाटकने उमराणी बंधाऱ्यात अडविल्याने खाली पोहोचू शकले नाही. परिणामी आठ गावांतील शेती-पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. हा प्रश्न दोन राज्यांतील असल्याने तो राज्य सरकारच्या स्तरावरचा आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनही हतबल झाले आहे. मात्र, लोकप्रतिनिधींनाही राज्याचे जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांच्याकडून प्रतिसाद मिळत नसल्याचे चित्र आहे.