Imtiaz Jalil : आम्ही निवडणुकीत पडलो, पण संपलो नाही : एमआयएम प्रदेशाध्यक्ष जलील,आगामी काळात एमआयएमला 'अच्छे दिन'

Solapur News : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत एमआयएम पूर्ण ताकदीने उतरणार आहे. एमआयएमला हरविण्यासाठी काहीही केले जाईल, कोणाचीही कोणासोबत युती किंवा आघाडी होईल. पैशांचा प्रचंड वापर केला जाईल. कार्यकर्त्यांनी या निवडणुकीत सजग रहावे, असे आवाहन केले.
MIM State President Jaleel expresses confidence in party’s revival after election defeat.
MIM State President Jaleel expresses confidence in party’s revival after election defeat.Sakal
Updated on

सोलापूर : लोकसभा व विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रात एमआयएम पराभूत झाली परंतु संपली नाही. आजही जनतेच्या मनात एमआयएम बद्दल प्रेम आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले होते, अच्छे दिन येणार आहेत. त्यांना अच्छे दिन आले की नाही, माहिती नाही परंतु स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत एमआयएमला अच्छे दिन नक्कीच येतील, असा विश्‍वास माजी खासदार तथा एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलिल यांनी व्यक्त केला.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com