

Farmers and villagers express concern as Ujani Dam water stoppage threatens crops and daily supply.
Sakal
सोलापूर: उजनी धरणातून भीमा नदीत चार हजार ४०० क्युसेक पाणी सोडले. मात्र, कर्नाटकने त्यांच्या उमराणी बंधाऱ्यात हे पाणी अडवले आहे. त्यामुळे खालील गावांतील शेतीच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. तर मंद्रूपसह आठ गावांच्या पिण्याचा पाणीपुरवठा बंद पडला आहे. याबाबत प्रशासनाने सरकारकडे बोट दाखवल्याच्या लोकप्रतिनिधी व शेतकऱ्यांच्या तक्रारी आहेत.