
पंढरपूर : समतेचा आणि शांतीचा संदेश देणाऱ्या पंढरी नगरीमध्ये आता खून, मारामाऱ्या आणि खंडणी या सारख्या गुन्हेगारी प्रकारांना उत आला आहे. दररोज घडणाऱ्या अशा घटनांमुळे पंढरपुरातील कायदा आणि सुव्यवस्थेचे धिंडवडे निघाल्याचे दिसून येत आहे. अशा वाढत्या गुन्हेगारी घटनांमुळे पंढरपुरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. दरम्यान पोलिसांकडून वेळीच कडक कारवाई होत नसल्याने गुन्हेगारांचे धाडस आणखी वाढत असल्याची लोकांमध्ये चर्चा आहे.