Post-Flood Rehabilitation Critical for Displaced Farmers in Madha Taluka
Sakal
सोलापूर
Solapur News:'जमीन खरवडून गेलेल्या शेतकऱ्यांच्या पुनर्वसनाची गरज'; जिल्हाधिकाऱ्यांकडून माढा तालुक्यातील पूरग्रस्त भागाची पाहणी
Farmers’ Land Lost in Floods: जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी माढा तालुक्यातील उंदरगाव, केवड, वाकाव या पूरग्रस्त गावांचा दौरा केला. ज्या ठिकाणी पायी जाणे अशक्य होते अशा ठिकाणी थेट ट्रॅक्टरमध्ये बसून ग्रामस्थांसमवेत त्यांनी बांधा बांधावर जाऊन पाहणी केली.
- किरण चव्हाण
माढा : जमीन खरवडून गेलेल्या शेतकऱ्यांच्या पुनर्वसनाची गरज असून त्यासाठी प्रयत्न करणार असून पूरग्रस्त भागात वेळीच मदत पोहोचल्याने जीवित हानी झाली नसून ९ ऑक्टोबरपर्यंत पंचनामे पूर्ण करणार असल्याचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी माढा तालुक्यातील पूरग्रस्त भागाची पाहणी करताना सांगितले.

