Dharashiv Rain Update:'शेतकऱ्यांच्या डोळ्यातील अश्रूंचा महापूर थांबेना'; पिके पाण्यात अन् संसार उघड्यावर, संषर्घ झाला कठीण..

Tears and Turmoil: धाराशिव जिल्ह्यातील बालाघाटाच्या डोंगर रांगेत सातत्याने मुसळधार पाऊस पडत आहे. त्यामुळे मोहोळ तालुक्यातील सीना, भोगावती, नागझरी व नीलकंठा या नद्यांना महापूर आला आहे. या महापुरामुळे नद्यांच्या दुतर्फा सुमारे एक किलोमीटर अंतरात महापुराचे पाणी विस्तारले आहे.
Endless Struggle for Farmers as Floods Destroy Crops and Livelihoods

Endless Struggle for Farmers as Floods Destroy Crops and Livelihoods

Sakal

Updated on

-गो. रा. कुंभार

नरखेड: ढग दाटलं, आभाळ फाटलं अन् शिवार भरून पाणी पडलंय. नद्या, नाले, ओढे पाण्याने तुडुंब भरून वाहत आहेत. पोटच्या लेकरा पेक्षाही जिवापाड जपलेली पिकं डोळ्या देखत पाण्यात नासू लागली. त्यामुळे मुसळधार पावसाने नद्यांना महापूर असला तरीही न भूतो न भविष्यती अशा नुकसानीमुळे नद्यांच्या महापुरापेक्षा शेतकऱ्यांच्या डोळ्यातील अश्रूंचा महापूर मात्र थांबेना झालाय. असे वाळूज येथील शेतकरी सुधीर मोटे यांनी हृदय पिळवटून टाकणारे दुःख सकाळशी बोलताना व्यक्त केले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com