
सोलापूर : विजेची गळती होत असल्यास वीजपुरवठा खंडित करून शॉक बसलेल्यास वाचविण्यासाठी ‘महावितरण’ने अवशिष्ट करंट सर्किट ब्रेकर (आरसीसीबी) हे विद्युत सुरक्षा उपकरण तयार केले आहे. मात्र, अनेकांना दुर्घटना होईपर्यंत त्याचे महत्त्व समजत नाही. सोलापूर शहर-जिल्ह्यात आठ दिवसांत झालेल्या तीन दुर्घटनांमध्ये सहा जणांना जीव गमवावा लागला आहे. कदाचित, दुर्घटना घडलेल्या ठिकाणी ‘आरसीसीबी’ उपक्रम असते तर या दुर्घटना घडल्याच नसत्या, असे महावितरणच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.