Mohol Farmer : नऊ हजार शेतकऱ्यांची नावे पोर्टल वरून येणार वगळण्यात; काय आहे कारण?

वेळोवेळी सांगून, कृषी सहाय्यकामार्फत प्रबोधन करूनही मोहोळ तालुक्यातील शेतकऱ्यांनी ई-केवायसी व आधार प्रमाणीकरण केले नाही.
PM Kisan Yojana
PM Kisan Yojanaesakal

मोहोळ - वेळोवेळी सांगून, कृषी सहाय्यकामार्फत प्रबोधन करूनही मोहोळ तालुक्यातील 4 हजार 220 शेतकऱ्यांनी ई-केवायसी व 4 हजार 700 शेतकऱ्यांनी आधार प्रमाणीकरण केले नाही. त्यामुळे त्यांना पीएम किसान योजनेचा लाभ मिळत नाही.

येत्या दोन दिवसात ई- केवायसी व आधार प्रमाणीकरण न केल्यास या शेतकऱ्यांची नावे पोर्टल वरून वगळण्यात येणार असून, त्याची प्राथमिक प्रक्रिया सुरू झाल्याची माहिती मोहोळचे तालुका कृषी अधिकारी अतुल पवार यांनी दिली.

या संदर्भात अधिक माहिती देताना पवार म्हणाले, जून महिन्या पासून कृषी विभागासह अन्य विभागानी शेतकऱ्यांनी ई-केवायसी व आधार प्रमाणीकरण करावे म्हणून मोठे प्रयत्न केले आहेत, अद्यापही ते सुरूच आहेत.

गावोगावी शिबिरे भरवुन तसेच वंचित लाभार्थ्यांच्या प्रत्यक्ष घरी जाऊन कृषी सहाय्यकांनी ई-केवायसी साठी प्रयत्न केले आहेत. अधिक माहिती साठी म्हणून ग्रामपंचायत व कृषी विभागाच्या कार्यालयात मराठीतून याद्याही लावल्या आहेत. व्हाट्सअप ग्रुप तयार करून आवाहनही केले होते.

प्रत्येक गावच्या सरपंचाला पत्र ही दिले आहे, अद्यापही ती प्रक्रिया सुरूच आहे. शेतकऱ्यांना लेखी पत्राद्वारेही कळविले आहे. जे लाभार्थी पोर्टल वर आहेत पण त्यांचा संपर्क होत नाही त्यांना वैयक्तिक अंतरदेशीय पत्रेही पाठवली आहेत.

येत्या काही दिवसात केंद्राच्या पीएम किसान योजनेच्या धरतीवर सीएम किसान योजनेचे पैसे ही शेतकऱ्यांना मिळणार आहेत. मात्र इ-केवायसी व आधार प्रमाणीकरण न केल्यास शेतकरी या योजने पासून ही वंचित राहणार आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com