Raju Shetti: शेतकऱ्यांच्या थडग्यावर विकासाचे मनोरे नको: राजू शेट्टी; 'शक्तिपीठ'मुळे ५५ हजार शेतकरी देशोधडीला लागणार

No Skyscrapers on Farmers’ Graves: शक्तिपीठ प्रकल्पामुळे जमिनी कसता येणार नाहीत, तर जमिनीत जाण्यासाठी पाणंद रस्त्यांची ही वाट लागणार आहे. मोठा पाऊस पडला तर या रस्त्यावरून पाणी वाहून जाण्याचा कुठेही मार्ग नाही. मुख्यमंत्र्यांचे बगलबच्चे म्हणतात या शक्तिपीठमुळे विदर्भ, मराठवाड्याचा विकास होणार आहे.
Raju Shetti
Raju Shetti sakal
Updated on

मोहोळ : शक्तिपीठ महामार्ग हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा ड्रीम प्रोजेक्ट आहे. हा प्रकल्प ८६ हजार ३०० कोटींचा आहे, मात्र दीड लाख कोटी रुपये जरी याची किंमत झाली तरी तो पूर्ण होईल की नाही याची खात्री नाही. विकासाला आमचा विरोध नाही, परंतु आमच्या थडग्यावर विकासाचे मनोरे बांधू नका. या प्रकल्पामुळे ५५ हजार शेतकरी देशोधडीला लागणार आहेत. त्यासाठी या महामार्गाला ताकदीने विरोध करा, असे प्रतिपादन माजी खासदार राजू शेट्टी यांनी केले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com