Fire Brigade : सोलापुरात अग्निसुरक्षा वाऱ्यावर; गरज २६ अग्निशमन केंद्रांची, प्रत्यक्षात पाचच

सोलापूर शहरात आगीच्या घटना, भिंत पडणे यासह विविध दुर्घटना घडल्यानंतर पहिला कॉल अग्निशामक दलाला केला जातो.
Fire Brigade
Fire Brigadesakal

सोलापूर - शहराचा विस्तार दिवसेंदिवस वाढत असून उंच इमारती उभ्या राहत आहेत. त्या तुलनेत महापालिकेच्या अग्निशमन विभागाकडे आग आटोक्यात आणण्यासाठी अपुरी साधने व मनुष्यबळाचा अभाव आहे. केंद्र सरकारच्या स्थायी अग्निशमन सल्लागार समितीच्या नियमानुसार २६ अग्निशामक केंद्रांची गरज असताना पाच प्रत्यक्षात पाच केंद्रे अस्तित्वात आहेत. त्यामुळे एका अग्निशमन केंद्रावर अडीच लाख लोकसंख्येचा भार आहे.

शहरात आगीच्या घटना, भिंत पडणे यासह विविध दुर्घटना घडल्यानंतर पहिला कॉल अग्निशामक दलाला केला जातो. महापालिकेच्या अग्निशामक दलाच्या केंद्रांची संख्या केवळ पाच आहे. केंद्र सरकारच्या स्थायी अग्निशमन सल्लागार समितीच्या नियमानुसार शहराची लोकसंख्या आणि हद्दीनुसार किती अग्निशामक केंद्रे असावीत याचे निकष दिले आहेत.

त्यानुसार शहराच्या पहिल्या एक लाख लोकसंख्येसाठी एक, तर त्यापुढील प्रत्येक ५० हजार लोकसंख्येसाठी एक केंद्र असावे. तर दुसऱ्या निकषानुसार १० किलोमीटरच्या हद्दीत एक केंद्र असे नमूद आहे. दाट लोकवस्तीत २० टक्के केंद्राची वाढ आणि धोका असलेल्या भागात आणखी काही केंद्रे उभारण्याचाही निकष आहे. त्यामुळे वाढत्या लोकसंख्येच्या निकषानुसार व नागरिकांच्या सोयीसाठी महापालिकेला आणखी किमान २१ केंद्रे उभारावी लागणार आहेत.

नवीन पाच केंद्रांच्या निर्मितीसह १३ गाड्या हव्या आहेत. तर ४५ कर्मचारी भरती प्रक्रिया सुरू आहे. मार्चनंतर तीन गाड्या प्रस्तावित करण्यात येणार आहेत. तसेच ५५ मीटर शिडी प्रस्तावित आहे.

- केदार आवटे, अधीक्षक, अग्निशामक दल, महापालिका, सोलापूर

शहरातील अग्निशमन केंद्र

सावरकर मैदान, साखर पेठ, होटगी रोड, भवानी पेठ, अक्कलकोट रोड एमआयडीसी.

इमारतींच्या फायर ऑडिटचे आव्हान

आग लागू नये, यासाठी खबरदारी केली आहे का, आग लागल्यास सुरक्षित बाहेर पडण्यासाठी मार्ग आहे का, अग्निरोधक यंत्रणा सुस्थितीत आहे का, या बाबी तपासून संबंधित इमारतीला फायर ऑडिटचे प्रमाणपत्र दिले जाते. त्यासाठी महापालिका अग्निशामक दलाची यंत्रणा वगळता शासनमान्य मक्तेदारामार्फतही करता येते. मात्र, ते होत नसल्याचे दिसते.

टोलेजंग इमारतींच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर

महापालिकेकडून ११ मजल्यांच्या म्हणजे ११० मीटर इमारतींना परवानगी दिली जात आहे. इतक्या उंच इमारतीवर आग लागल्याृस ती आटोक्यात आणण्यासाठीची यंत्रणा अग्निशामक दलाकडे नाही.

४५ कर्मचाऱ्यांची भरती सुरू

सध्या पाच केंद्रांकडे ३४ कर्मचारी आहेत. नव्या ४५ कर्मचाऱ्यांच्या भरतीची प्रक्रिया सुरू आहे. त्यासाठीची लेखी, तोंडी परीक्षा झाली आहे. निकालानंतर पुढील प्रक्रिया पार पडल्यावर ते अग्निशामक दलाकडे दाखल होतील.

ठळक बाबी

  • शहराची लोकसंख्या ९, ५७००० (२०११ च्या जनगणनेनुसार. अंदाजे वाढलेली लोकसंख्या १३, ५८०००)

  • शहराचे क्षेत्रफळ १७८.५५ चौरस मीटर

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com