
सोलापूर : नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी आता पदवी व पदव्युत्तर पदवीसाठी सुरू झाली असून त्यात विद्यार्थ्यांची गुणवत्ता व त्यांच्या आवडी-निवडीस प्राधान्य देण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांच्या तासिका नियमित व्हाव्यात, यासाठी प्रत्येक उच्च महाविद्यालयांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसविले जाणार आहेत. तर प्राध्यापकांची हजेरी क्लासरूममध्ये बायोमेट्रिकद्वारे नोंदविली जाणार आहे.