फुटलेल्या कालव्याची दुरुस्ती अंतिम टप्प्यात; शेतीसाठी उजनीतून पुन्हा सुटणार २२ फेब्रुवारीनंतर पाणी

डावा कालवा पाटकुलजवळ फुटल्यानंतर तातडीने धरणातील पाणी बंद करावे लागले होते. आता यांत्रिकी विभागाकडून युद्धपातळीवर दुरुस्ती सुरु आहे. क्वालिटी कंट्रोल विभागाचे अधिकारी ठाण मांडून आहेत. २२ फेब्रुवारीनंतर पुन्हा त्या कालव्यातून शेतीसाठी पाणी सोडले जाणार आहे.
उजनी कॅनाल
उजनी कॅनाल Sakal

सोलापूर : साखर कारखान्यांना ऊस तुटून गेल्यानंतर उजनीतून सोडलेल्या कॅनॉलच्या पाण्यावर ते क्षेत्र भिजवून घेतले जाते. पण, डावा कालवा पाटकुलजवळ फुटल्यानंतर तातडीने धरणातील पाणी बंद करावे लागले होते. आता त्या कालव्याची दुरुस्ती यांत्रिकी विभागाकडून युद्धपातळीवर सुरु आहे. क्वालिटी कंट्रोल विभागाचे अधिकारी त्या ठिकाणी ठाण मांडून आहेत. २२ फेब्रुवारीनंतर पुन्हा त्या कालव्यातून शेतीसाठी पाणी सोडले जाणार आहे.

सोलापूर, नगर व पुणे जिल्ह्यासाठी वरदान असलेल्या उजनी धरणामुळे सोलापूर जिल्ह्यात उसाचे क्षेत्र वाढले आणि साखर कारखान्यांची संख्या सर्वाधिक झाली. मुख्यत्वे डावा व उजवा कालव्यातून शेतीसाठी उजनीचे पाणी सोडले जाते. सीना-माढा उपसा सिंचन योजना दहिगाव उपसा सिंचन योजना, कॅनॉल अशा पद्धतीने शेतीला उजनीतून पाणीपुरवठा होतो.

कालवा दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर

पाटकुलजवळ फुटल्याने डाव्या कालव्याची दुरुस्ती युद्धतपाळीवर सुरु आहे. सहा-सात दिवसांत काम पूर्ण झाल्यानंतर पुन्हा शेतीसाठी पाणी सोडले जाईल. नुकसानीच्या पंचनामे झाले असून कृषी व महसूल विभागाचा अहवाल आल्यानंतर बाधित शेतकऱ्यांना भरपाई मिळेल.

- धीरज साळे, अधीक्षक अभियंता, लाभक्षेत्र विकास प्राधिकरण, सोलापूर

उजनी धरण अजूनही १०० टक्केच

एकूण पाणीसाठा

१०४.०४ टीएमसी

जिवंत पाणीसाठा

४०.३८ टीएमसी

जिवंत पाण्याची टक्केवारी

७५.३७ टक्के

मुख्य कॅनॉलद्वारे सोडलेले पाणी

८०० क्युसेक

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com